शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:23 IST

आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो.

ठळक मुद्देराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान : लवकरच होणार कार्यालयाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो. मात्र आता या पद्धतीत बदल होणार असून नगर परिषदेच्या माध्यमातून मजूर उपलब्ध करवून दिले जाणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे प्रयोग केला जाणार आहे. यासाठी लवकरच कार्यालयाची स्थापना केली जाणार असून तेथून कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांची पुर्तता केली जाणार आहे.शहराच्या भाजी बाजारात मजूर चौक आहे. दररोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात मजूर जमा होतात. ज्यांना मजूरांची गरज असते ते या चौकात येतात व मजुरांशी बोलणी करून घेऊन जातात.या मजूर चौकाची विशेषता अशी की, येथे फक्त मजूरच मिळत नसून प्रत्येकच कामात तरबेज कारागीर मिळतात. देशातील बहुतांश शहरातील हीच स्थिती आहे. मात्र भविष्यात शहरात सुरू असलेली परंपरा बदलणार असून मजूर चौक जवळील टाऊन स्कूलमध्ये स्थानांतरीत होऊ सकते.त्याचे असे की, राज्य शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्यालय नगर परिषदेच्या टाऊन स्कूलमध्ये असून ही योजना नगर परिषदेच्या माध्यमातून राबविली जात आहे.शासनाच्या या योजनेंतर्गत शहर उपजिवीका केंद्राचे गठन केले जात आहे. हे केंद्र कार्यालयाच्या खाली रिकाम्या भवनात देण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. असे झाल्यास शहरातील सर्वच मजुर या कार्यालयाशी जुळतील.या अभियानाचे व्यवस्थापक बनकर यांच्यानुसार, या भवनातील चार खोल्यांना एकत्र जोडण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला लवकरच प्रस्ताव पाठविण्याची तयारी असून त्यानंतरच काम केले जाईल.अशी राहणार उपजीविका केंद्राची व्यवस्थाशहरातील या उपजीविका केंद्राला कौशल्य विकास केंद्र बनविले जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्या नंतर कौशल्य विकास उपलब्ध करविण्याच्या दिशेने काम सुरू झाले आहे. याच योजनेला पुढे वाढवित या केंद्रात कौशल्य आधारीत कारागिर एकत्र जोडले जातील. यातंर्गत प्लंबर, मिस्त्री, मजूर, वेल्डर, कारपेंटरसह कुशल मजुरांना जोडले जाईल. प्रत्येक क्षेत्रातील किमान १०० कारागिरांची यादीच केंद्रात उपलब्ध राहील. यात त्यांच्यासोबत एक करार केला जाईल. एवढेच नव्हे तर कंत्राटदारांसोबतही या कारागिरांच्या सेवेबाबत करार केला जाईल. यामुळे सर्वसामान्यांसह कंत्राटदारांना निश्चीत दरात कारागिर उपलब्ध होतील व या मोबदल्यात कंत्राटदारांना एक रक्कम केंद्राला द्यावी लागेल. सोबतच या केंद्रात बचतगटांच्या विक्री केंद्राचीही स्थापना केली जाणार आहे. या केंद्राला एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यास मजूर उपलब्ध करवून दिले जाईल.