शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:23 IST

आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो.

ठळक मुद्देराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान : लवकरच होणार कार्यालयाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो. मात्र आता या पद्धतीत बदल होणार असून नगर परिषदेच्या माध्यमातून मजूर उपलब्ध करवून दिले जाणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे प्रयोग केला जाणार आहे. यासाठी लवकरच कार्यालयाची स्थापना केली जाणार असून तेथून कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांची पुर्तता केली जाणार आहे.शहराच्या भाजी बाजारात मजूर चौक आहे. दररोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात मजूर जमा होतात. ज्यांना मजूरांची गरज असते ते या चौकात येतात व मजुरांशी बोलणी करून घेऊन जातात.या मजूर चौकाची विशेषता अशी की, येथे फक्त मजूरच मिळत नसून प्रत्येकच कामात तरबेज कारागीर मिळतात. देशातील बहुतांश शहरातील हीच स्थिती आहे. मात्र भविष्यात शहरात सुरू असलेली परंपरा बदलणार असून मजूर चौक जवळील टाऊन स्कूलमध्ये स्थानांतरीत होऊ सकते.त्याचे असे की, राज्य शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्यालय नगर परिषदेच्या टाऊन स्कूलमध्ये असून ही योजना नगर परिषदेच्या माध्यमातून राबविली जात आहे.शासनाच्या या योजनेंतर्गत शहर उपजिवीका केंद्राचे गठन केले जात आहे. हे केंद्र कार्यालयाच्या खाली रिकाम्या भवनात देण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. असे झाल्यास शहरातील सर्वच मजुर या कार्यालयाशी जुळतील.या अभियानाचे व्यवस्थापक बनकर यांच्यानुसार, या भवनातील चार खोल्यांना एकत्र जोडण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला लवकरच प्रस्ताव पाठविण्याची तयारी असून त्यानंतरच काम केले जाईल.अशी राहणार उपजीविका केंद्राची व्यवस्थाशहरातील या उपजीविका केंद्राला कौशल्य विकास केंद्र बनविले जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्या नंतर कौशल्य विकास उपलब्ध करविण्याच्या दिशेने काम सुरू झाले आहे. याच योजनेला पुढे वाढवित या केंद्रात कौशल्य आधारीत कारागिर एकत्र जोडले जातील. यातंर्गत प्लंबर, मिस्त्री, मजूर, वेल्डर, कारपेंटरसह कुशल मजुरांना जोडले जाईल. प्रत्येक क्षेत्रातील किमान १०० कारागिरांची यादीच केंद्रात उपलब्ध राहील. यात त्यांच्यासोबत एक करार केला जाईल. एवढेच नव्हे तर कंत्राटदारांसोबतही या कारागिरांच्या सेवेबाबत करार केला जाईल. यामुळे सर्वसामान्यांसह कंत्राटदारांना निश्चीत दरात कारागिर उपलब्ध होतील व या मोबदल्यात कंत्राटदारांना एक रक्कम केंद्राला द्यावी लागेल. सोबतच या केंद्रात बचतगटांच्या विक्री केंद्राचीही स्थापना केली जाणार आहे. या केंद्राला एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यास मजूर उपलब्ध करवून दिले जाईल.