शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

सापांना जंगलात सोडणे घातकच

By admin | Updated: August 19, 2015 02:01 IST

दरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागराजाची मूर्ती बसवून मंदिर उभारले जातात...

नाग शेतकऱ्यांचा मित्र : सापांबाबत नागरिकांचे समज-गैरसमजविजय मानकर  सालेकसादरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागराजाची मूर्ती बसवून मंदिर उभारले जातात व नाग देवतेचे पूजन केले जाते. परंतु प्रत्यक्षात साप दिसला की त्याला धोकादायक समजून त्याला ठार केल्याशिवाय मनुष्य श्वास घेत नाही, अशीही काही लोकांची मानसिकता असून ती मोठीच शोकांतिका आहे.साप हा सरपटणारा प्राणी असून जमिनीतील छिद्रांमध्ये त्याचे वास्तव्य असते. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीत लपून असला तरी तो आपल्या भोजनाच्या शोधात सतत इकडे-तिकडे सरपटत असतो. या दरम्यान तो मानव जातीच्या नजरेस पडला की त्याचा मृत्यू ओढवल्याशिवाय राहत नाही. काही सर्पमित्र सापाला पकडून मारणाऱ्यांच्या ताब्यातून सोडवतात व त्याला जंगलात नेवून सोडतात. साप खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र ठरतो. शेतात राहणारे उंदिर, बेडूक आदी जीव-जंतूंना आपला आहार बनवितो. बेडूक हा शेतात पिकांवरील किडींचे भक्षण करतो. त्यामुळे शेतात बेडूक आवश्यक आहे. बेडकांचे प्रमाण वाढले तर त्याचे भक्षण साप करतो. सापांचे प्रमाण वाढले तर त्या परिसरात सापांचे भक्षण करणारे मुंगूस यासारखे प्राणीसुद्धा येतात. अशाप्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पिकांचे संरक्षण सापांच्या माध्यमातून होत असते. या सर्व बाबी शेतकऱ्यांना माहीत असूनही काही लोक साप दिसला की विशेषकरून नाग सापाला ताबडतोब मारून टाकतात. खरे पाहिले तर कोणताही साप स्वत:हून माणसाला डंख मारत नाही. उलट तो खूप भित्रा प्राणी आहे. मनुष्य दिसला की किंवा स्पंदनाने आभास होताच तो जोराने सरपटत पळ काढतो. जेव्हा सापाला असे वाटते की आपल्यावर हल्ला होत आहे किंवा आपल्या शरिराला इजा पोहचत आहे, तेव्हाच तो आत्मरक्षणासाठी डंख मारतो. परंतु तो माणसाचा शत्रू मुळीच नसून प्रत्येकाने सापाला जीवनदान देण्याचा प्रयत्न करावा.शेत, गाव परिसर व जंगलातील सापांच्या आहारात भिन्नतागाव परिसरात आढळणाऱ्या सापांचे रंग व आहाराचे प्रकार गाव परिसरात मिळणाऱ्या कीटकांवर अवलंबून असतात. तर शेतात राहणारा साप शेतात आढळणाऱ्या बेडूक व इतर कीटकांवर अवलंबून असतो. जंगलात राहणारा साप तेथील रंग व मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असतो. सर्व प्रकारच्या सापांमध्ये मोठी विविधता असते. त्यामुळे गाव परिसरात राहणाऱ्या सापाचे जंगल परिसरातील हवामानात जगणे कठीण असते. तर जंगलात वावरणारा साप इतर भागात जाऊन जीवन जगणे त्याला सोईस्कर ठरत नसते. त्यामुळे गावात आढणाऱ्या सापाला मारले, तर ती प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु जर त्याला जंगलात नेऊन सोडले तर तो तेथे जिवंत राहणार नाही किंवा इतर कीटकांशी लढा देऊ शकणार नाही. त्यामुळे गावातील साप पकडून त्याला जंगलात सोडण्यापेक्षा त्याला त्याच परिसरात मोकळ्यापणाने जाऊ देणे सापांच्या प्रती खरी मित्रता ठरेल. तसेच काही गारूडी लोक सापांना पकडून गावागावात फिरवतात व पोटपाण्याचे साधन बनवितात. परंतु ते साप त्यांच्याजवळ जिवंत राहू शकत नाही.