शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवासच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: August 6, 2015 00:46 IST

१५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते.

भूकंपानंतर खिळखिळा : बांधकामातील दोष उघडकाचेवानी : १५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामाचे उदाहरण असलेल्या या घरकुलांतर्गत तालुक्यातील ग्राम खुरखुडी येथील दीनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या अन्य घरकुलांची तपासणी करण्याची, तसेच कोसरे यांना नवे घरकूल देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे. गेल्या २३ जुलैला झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने तिरोडा तालुक्याच्या खुरखुडी येथील दिनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घराच्या छताला भेग पडून तो वाकला होता. हा वाकलेली स्लॅब चार दिवसांपूर्वी रात्री ८.३० वाजताच्यादरम्यान कोसळला. सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्याने स्लॅब ७० टक्के वाकल्यानंतर त्या ठिकाणावरून वावरणे बंद करण्यात आले होते, त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही, असे परिवाराने सांगितले. भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी (दि.२४) ला महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. मात्र त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही किंवा दखल घेतली नाही, असे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भूकंपाच्या धक्क्याने वाकलेला स्लॅब कोसळल्याने मनोज डोंगरे, पं.स. सदस्य मनोहर राऊत, सरपंच प्रमिला बोपचे, पोलीस पाटील भारती रामटेके, उपसरपंच गणेश रहांगडाले, ग्रामसेवक एस.एन. तळेगावकर, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष छबीलाल पटले आणि अन्य ग्रा.पं. सदस्याच्या प्रमुख उपस्थितीत घटनास्थळी जावून कोसळलेल्या छताचा पंचनामा करण्यात आला. लगेच याची सूचना उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी दाते यांना पाठवून अहवाल सादर केला. (वार्ताहर)जिल्ह्यातील ९० टक्के घरकुलांची दुर्दशा १५ ते २० वर्षापूर्वी इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रयात जीवन जगणाऱ्या आणि घर नसणाऱ्यांकरिता घरकुल तयार करून देण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम बघता त्या घरकुलाचे आयुष्य १० वर्षाच्या वर नसल्याचे दिसून येते. त्यात आजघडीला या घरकुलांची दशा अधिकच दयनीय झाली आहे. ज्यावेळी ही घरकुले बांधली त्या काळी निधी फारच कमी असल्याने कंत्राटदारांनी कसेतरी बांधकाम केले. परिणामी बांधकाम मजबूत झाले नाही. संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी इंदिरा आवासचे घरकूल अशाच पद्धतीने तकलादू असल्याचे सांगितले जात आहे.इंदिरा आवासमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची आजची स्थिती पाहिली तर डुकरांच्या झोपड्यामध्ये राहण्यासारखी तिथे राहणाऱ्यांची स्थिती आहे. भूकंपासारखी घटना किंवा संततधार पावसात एखादे घरकूल कोसळले तर जीवहानी होऊ शकते.