शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवासच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: August 6, 2015 00:46 IST

१५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते.

भूकंपानंतर खिळखिळा : बांधकामातील दोष उघडकाचेवानी : १५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामाचे उदाहरण असलेल्या या घरकुलांतर्गत तालुक्यातील ग्राम खुरखुडी येथील दीनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या अन्य घरकुलांची तपासणी करण्याची, तसेच कोसरे यांना नवे घरकूल देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे. गेल्या २३ जुलैला झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने तिरोडा तालुक्याच्या खुरखुडी येथील दिनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घराच्या छताला भेग पडून तो वाकला होता. हा वाकलेली स्लॅब चार दिवसांपूर्वी रात्री ८.३० वाजताच्यादरम्यान कोसळला. सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्याने स्लॅब ७० टक्के वाकल्यानंतर त्या ठिकाणावरून वावरणे बंद करण्यात आले होते, त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही, असे परिवाराने सांगितले. भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी (दि.२४) ला महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. मात्र त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही किंवा दखल घेतली नाही, असे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भूकंपाच्या धक्क्याने वाकलेला स्लॅब कोसळल्याने मनोज डोंगरे, पं.स. सदस्य मनोहर राऊत, सरपंच प्रमिला बोपचे, पोलीस पाटील भारती रामटेके, उपसरपंच गणेश रहांगडाले, ग्रामसेवक एस.एन. तळेगावकर, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष छबीलाल पटले आणि अन्य ग्रा.पं. सदस्याच्या प्रमुख उपस्थितीत घटनास्थळी जावून कोसळलेल्या छताचा पंचनामा करण्यात आला. लगेच याची सूचना उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी दाते यांना पाठवून अहवाल सादर केला. (वार्ताहर)जिल्ह्यातील ९० टक्के घरकुलांची दुर्दशा १५ ते २० वर्षापूर्वी इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रयात जीवन जगणाऱ्या आणि घर नसणाऱ्यांकरिता घरकुल तयार करून देण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम बघता त्या घरकुलाचे आयुष्य १० वर्षाच्या वर नसल्याचे दिसून येते. त्यात आजघडीला या घरकुलांची दशा अधिकच दयनीय झाली आहे. ज्यावेळी ही घरकुले बांधली त्या काळी निधी फारच कमी असल्याने कंत्राटदारांनी कसेतरी बांधकाम केले. परिणामी बांधकाम मजबूत झाले नाही. संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी इंदिरा आवासचे घरकूल अशाच पद्धतीने तकलादू असल्याचे सांगितले जात आहे.इंदिरा आवासमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची आजची स्थिती पाहिली तर डुकरांच्या झोपड्यामध्ये राहण्यासारखी तिथे राहणाऱ्यांची स्थिती आहे. भूकंपासारखी घटना किंवा संततधार पावसात एखादे घरकूल कोसळले तर जीवहानी होऊ शकते.