शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:17 IST

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्दे३५१ गावे बाधित : १० हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासन मदतीसाठी नेमके कोणते निकष लावून मदत जाहीर करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील खरीप हंगामात कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळायचीच असताना आता रब्बी पिकांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आशेवर पूर्णत: पाणी फेरल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे सुरूवातीला कृषी विभागाने ४०० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे केल्यानंतर तब्बल ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आले आहे. यात गहू, हरभरा, लाखोळी, भाजीपाला, धान या पिकांचे व आंबा, केळी, अ‍ॅपल बोर या फळबांगाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल २ हजार ८४१ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर १४८९ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गारपीट व वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू व वटाण्याचे पीक भूईसपाट झाल्याने त्यांच्या हाती काहीच येणार नसल्याचे चित्र आहे. रब्बीतील पिके हातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर केलेला लागवड खर्च आणि कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे शासन नुकसान भरपाईपासाठी कोणता निकष लावून मदत जाहीर करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगरखरीप व रब्बीतील पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी बँका आणि सावकारांकडून उचल केलेल्या कर्जाची परफेड कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या डोंगरखाली आल्याचे चित्र आहे.