शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:17 IST

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्दे३५१ गावे बाधित : १० हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासन मदतीसाठी नेमके कोणते निकष लावून मदत जाहीर करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील खरीप हंगामात कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळायचीच असताना आता रब्बी पिकांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आशेवर पूर्णत: पाणी फेरल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे सुरूवातीला कृषी विभागाने ४०० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे केल्यानंतर तब्बल ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आले आहे. यात गहू, हरभरा, लाखोळी, भाजीपाला, धान या पिकांचे व आंबा, केळी, अ‍ॅपल बोर या फळबांगाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल २ हजार ८४१ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर १४८९ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गारपीट व वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू व वटाण्याचे पीक भूईसपाट झाल्याने त्यांच्या हाती काहीच येणार नसल्याचे चित्र आहे. रब्बीतील पिके हातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर केलेला लागवड खर्च आणि कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे शासन नुकसान भरपाईपासाठी कोणता निकष लावून मदत जाहीर करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगरखरीप व रब्बीतील पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी बँका आणि सावकारांकडून उचल केलेल्या कर्जाची परफेड कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या डोंगरखाली आल्याचे चित्र आहे.