शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

दिव्यांगांना शासनाच्या सवलती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:59 IST

दिव्यांग व्यक्तींसाठी बहुतेक बँका अजुनही सुगम्य होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. बहुतेक बँका व एटीएमबाहेर रॅम्प नसल्याने व्हीलचेअर वरील दिव्यांगाना प्रवेश करणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात २९ हजार दिव्यांग : बँक-एटीएममध्ये जाणे कठीण

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : दिव्यांग व्यक्तींसाठी बहुतेक बँका अजुनही सुगम्य होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. बहुतेक बँका व एटीएमबाहेर रॅम्प नसल्याने व्हीलचेअर वरील दिव्यांगाना प्रवेश करणे शक्य होत नाही. त्यामुळे एटीएममध्ये न जाता इतरांना पिन क्रमांक देऊन एटीएममधून पैसे काढावे लागतात. अंध व्यक्तीनांही पायऱ्यांचा अडथळा पार करुन जावे लागत आहे.दिव्यांग व्यक्तींना कोठेही सहजपणे फिरता यावे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता यावा आणि माहिती व संपर्क या माध्यमांचा सहजरित्या वापर करता यावा, या उद्देशाने केंद्र सरकारने सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे.या अंतर्गत टप्पाटप्याने दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सोयी-सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. पण बहुतेक बँकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. अभियानाला सुरुवात होऊन तीन वर्षे उलटून गेली, तरी अभियानाची सक्षमपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. जिल्ह्यातील विविध शहरात तुरळक बॅका वगळता बहुतेक बँका व एटीएमला रॅम्पची सोय नसल्याचे दिसून आले.एकट्या गोंदिया जिल्ह्यात २९ हजार दिव्यांग आहेत. पण त्यांना प्राप्त सुविधा कागदावरच पहावयास मिळतात. दिव्यांगाप्रती शासन पाहिजे तेवढे जागरूक नाही हा दिव्यांगांचा आरोपही त्यांना प्राप्त सुविधा पाहिल्यावर सहज कळतो.बँकांनी केले रॅम्पकडे दुर्लक्षव्हीलचेअरवरील दिव्यांग व्यक्तींना रॅम्पशिवाय बँकेत किंवा एटीएममध्ये जाता येत नाही. त्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. एटीएममधून पैसे काढायचे असल्यास सोबत कोणीतरी हवे असते. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला एटीएम व पिन क्रमांक अशी गोपनीय माहिती द्यावी लागते. त्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची भिती असते. अंध किंवा जायबंदी असलेल्या व्यक्तींना पायºयावरुन चढणे सहज शक्य होत नाही. रॅम्प असल्यास त्यावरुन ये-जा करणे सोपे जाते. पण याकडे बहुतेक बँकानी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाच्या सुगम्य भारत योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी रॅम्प करण्यासाठी निधी दिला जातो. पण प्रत्यक्षात ही योजना कागदोपत्रीच उरलेली आहे. बँक, एटीएम, बस स्थानके, रेल्वे स्थानके, शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन यासारख्या ठिकाणी रॅम्प असणे आवश्यक आहे. बहुतेक एटीएममध्ये इतरांच्या मदतीशिवाय साधा प्रवेशही करता येत नाही. बँकेत विड्रॉल करताना अनेकदा बँक मॅनेजरशी वाद झाले आहेत.-रामलाल नागरिकर, दिव्यांग, गोरेगाव.