शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना शासनाच्या सवलती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:59 IST

दिव्यांग व्यक्तींसाठी बहुतेक बँका अजुनही सुगम्य होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. बहुतेक बँका व एटीएमबाहेर रॅम्प नसल्याने व्हीलचेअर वरील दिव्यांगाना प्रवेश करणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात २९ हजार दिव्यांग : बँक-एटीएममध्ये जाणे कठीण

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : दिव्यांग व्यक्तींसाठी बहुतेक बँका अजुनही सुगम्य होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. बहुतेक बँका व एटीएमबाहेर रॅम्प नसल्याने व्हीलचेअर वरील दिव्यांगाना प्रवेश करणे शक्य होत नाही. त्यामुळे एटीएममध्ये न जाता इतरांना पिन क्रमांक देऊन एटीएममधून पैसे काढावे लागतात. अंध व्यक्तीनांही पायऱ्यांचा अडथळा पार करुन जावे लागत आहे.दिव्यांग व्यक्तींना कोठेही सहजपणे फिरता यावे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता यावा आणि माहिती व संपर्क या माध्यमांचा सहजरित्या वापर करता यावा, या उद्देशाने केंद्र सरकारने सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे.या अंतर्गत टप्पाटप्याने दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सोयी-सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. पण बहुतेक बँकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. अभियानाला सुरुवात होऊन तीन वर्षे उलटून गेली, तरी अभियानाची सक्षमपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. जिल्ह्यातील विविध शहरात तुरळक बॅका वगळता बहुतेक बँका व एटीएमला रॅम्पची सोय नसल्याचे दिसून आले.एकट्या गोंदिया जिल्ह्यात २९ हजार दिव्यांग आहेत. पण त्यांना प्राप्त सुविधा कागदावरच पहावयास मिळतात. दिव्यांगाप्रती शासन पाहिजे तेवढे जागरूक नाही हा दिव्यांगांचा आरोपही त्यांना प्राप्त सुविधा पाहिल्यावर सहज कळतो.बँकांनी केले रॅम्पकडे दुर्लक्षव्हीलचेअरवरील दिव्यांग व्यक्तींना रॅम्पशिवाय बँकेत किंवा एटीएममध्ये जाता येत नाही. त्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. एटीएममधून पैसे काढायचे असल्यास सोबत कोणीतरी हवे असते. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला एटीएम व पिन क्रमांक अशी गोपनीय माहिती द्यावी लागते. त्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची भिती असते. अंध किंवा जायबंदी असलेल्या व्यक्तींना पायºयावरुन चढणे सहज शक्य होत नाही. रॅम्प असल्यास त्यावरुन ये-जा करणे सोपे जाते. पण याकडे बहुतेक बँकानी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाच्या सुगम्य भारत योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी रॅम्प करण्यासाठी निधी दिला जातो. पण प्रत्यक्षात ही योजना कागदोपत्रीच उरलेली आहे. बँक, एटीएम, बस स्थानके, रेल्वे स्थानके, शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन यासारख्या ठिकाणी रॅम्प असणे आवश्यक आहे. बहुतेक एटीएममध्ये इतरांच्या मदतीशिवाय साधा प्रवेशही करता येत नाही. बँकेत विड्रॉल करताना अनेकदा बँक मॅनेजरशी वाद झाले आहेत.-रामलाल नागरिकर, दिव्यांग, गोरेगाव.