शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

गाडगेबाबांनी माणसांची मने स्वच्छ करून प्रबोधन केले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

अर्जुनी मोरगाव : संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून थेट श्रोत्यांशी हृदय संवाद करीत. सिंहाला पाहावे रानात, मोराला पाहावे नृत्यात, तसे ...

अर्जुनी मोरगाव : संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून थेट श्रोत्यांशी हृदय संवाद करीत. सिंहाला पाहावे रानात, मोराला पाहावे नृत्यात, तसे गाडगेबाबांना पहावे सदैव कीर्तनात असे म्हटले जाते. गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यांनी परिसर स्वच्छ केला. झाडू आणि फुटका कुंभ हे बाबांच्या वैराग्याचे प्रतीक आहे. झाडू हे कर्माचे रूपक आहे तर फुटके कुंभ हे त्यांच्या निर्लेप वृत्तीचे बिंब आहे. त्यांनी माणसांची मने स्वच्छ करून प्रबोधन केले, असे कवितेच्या माध्यमातून सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव अनिल मंत्री यांनी सांगितले.

याच बरोबर कोरोनाचा वाढता प्रभाव बघून शाळेचे नियोजन व त्याविषयी घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शनही त्यांनी केले. सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिथी म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, संजय बंगळे, प्रा. यादव बुरडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते देवी सरस्वती व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. इंद्रनील काशिवार, प्रा. नंदा लाडसे, प्रा. टी. एस. बिसेन, माधुरी पिलारे, रूपराम धकाते, भाग्यश्री सिडाम, सुजित जक्कूलवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. डी. पठाण व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

......

‘एक मिनिट स्वच्छतेचा’ उपक्रम

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत संपूर्ण वर्षभर ‘एक मिनिट स्वच्छतेचा’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाअंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्येक दिवशी स्वच्छतेसाठी एक मिनिट श्रमदान करायचे आहे. शालेय परिसर वर्ग, शाळा, घर इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायची आहे. परिसरासोबतच मनामनाची स्वच्छता करून बंधुभाव व सामंजस्य जोपासायचे आहे.