शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची

By admin | Updated: September 6, 2015 01:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून आपल्या देशाला अन्य देशांप्रमाणे स्वच्छ करण्याचे स्वप्न बघितले.

मान्यवरांची भावना : स्थिती सुधारण्याची आशागोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून आपल्या देशाला अन्य देशांप्रमाणे स्वच्छ करण्याचे स्वप्न बघितले. मात्र त्यांच्या या अभियानाला प्रसिद्धीचे एक माध्यम बनविण्यात आले. एक दिवस हातात झाडू घेतल्याने सफाई होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी समजून किमान स्वत:च्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी भावना शहरातील मान्यवरांनी ‘लोकमत परिचर्चेत’ व्यक्त केली. त्यासाठी स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.देशाला घाणीपासून मुक्त करून स्वच्छ परिसर व स्वच्छ वातावरण निर्मितीसाठी स्वच्छ भारत अभियान छेडले. या अभियानांतर्गत अनेक जण स्वत: हाती झाडू घेतला व रस्त्यावर उतरले. खुद्द पंतप्रधान रस्त्यावर उतरल्याने त्यांचे चाहते व पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्तेच काय सामाजीक संस्था, शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालयांतही अभियान राबविण्यात आले. काही दिवस या स्वच्छता अभियानाचा जणू सर्वांनाच ज्वर चढला व पाहिजे तेथे स्वच्छता अभियान छेडले जाऊ लागले. विशेष म्हणजे जिल्हास्तरावर तर समित्याही गठित करण्यात आल्या होत्या. यावरून स्वच्छता अभियान हे आता कायमस्वरूपी राबविले जाणार असल्याचे वाटत होते. मात्र कालांतराने नागरिकांचा तो भ्रम भंगला. त्यानंतर गोंदियाची शहराची स्थिती आहे ती सर्वांसमक्ष आहेच. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार, कचरा व सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या दिसून येतात. स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. यासाठी स्वत: आपापल्या घरातील कचरा एकत्र करून घंटागाडीत टाकावा. स्वच्छता अभियान हा कार्यक्रम शिकण्यासाठी चांगला आहे. मात्र नगर परिषदेची ही जबाबदारी असल्याने त्यांनी कर्मचारी व साहीत्यांत वाढ करावी. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच चौपाटी, हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांत स्वच्छतेबाबत जागृती व गरज पडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचीही गरज आहे. रूपेश निंबार्ते अध्यक्ष हिरवळ बहु. संस्था स्वच्छता अभियान हे एक दिवसाचे नसावे. महिन्यातून एकदा तरी स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. नगरसेवक व पालिका प्रशासनाकडून त्यांच्याकडे आहे तेवढ्या साधनांतून काम केले जात आहे. ते पर्याप्त नाही हे खरे आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: आपली जबाबदारी समजण्याची गरज आहे. पालिकेच्या भरवशावर राहून स्वच्छता होऊ शकत नाही. यासाठी सर्वांनी बाहेर पडावे. आपले घर व आपले परिसर स्वच्छ ठेवण्याचे कार्य जरी प्रत्येकाने केले, तरी शहर स्वच्छ होऊ शकते. डॉ. धनश्याम तुरकरशहरात बहुतांश नागरिक शिक्षीत असूनही ते आपल्या घरातील कचरा रस्त्यावर व नाल्यांत टाकत आहे. शहरात घंटागाडी सुरू आहे. मात्र दररोज प्रत्येकाच्या घरी घंटागाडी येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घरातील कचरा गोळा करून एक-दोन दिवसांत येत असलेल्या घंटागाडीत टाकला पाहिजे. मात्र तसे होत नाही. नागरिक जागा मिळेल तेथे कचरा टाकून मोकळे होतात. आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घराबाहेर कचरा टाकतात. कचरा साठविण्यासाठी आम्ही ४० कंटेनरचा ठराव पारित केला आहे. सोबतच डासांवर आळा घालण्यासाठी फवारणी व फॉंग्ािंगही करीत आहो. नागरिकांनीही सहकार्य केल्यास आपले शहर स्वच्छ ठेवता येईल. -हर्षपाल रंगारी उपाध्यक्ष, नगर परिषद, गोंदिया नियमीत कचरा टाकण्यासाठी पालिकेकडून प्रयोजन करण्यात आलेले नाही. घंटागाडी नियमीत येत नाही. त्यात स्वच्छता अभियान चालविले जातात. एक-दोन दिवस अभियान चालते व नंतर तीच स्थिती निर्माण होते. पालिकेच्या भरवशावर राहून चालणार नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी समजून घेण्याची गरज आहे. आमच्या परिसरातील महिला एकत्र कचरा गोळा करून आठवड्यातून त्याची विल्हेवाट लावतो. अशाच प्रकारे कचरा इकडे-तिकडे न टाकता एकत्रित करावा.-पूजा जोशी गृहिणी