शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या २,२७० जागा रिक्त ?

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांची खिरापत वाटताना अकरावी प्रवेशासाठी असलेली प्रवेश क्षमता जास्त आणि विद्यार्थी कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

देवानंद शहारे गोंदियाजिल्ह्यात शैक्षणिक संस्थांची खिरापत वाटताना अकरावी प्रवेशासाठी असलेली प्रवेश क्षमता जास्त आणि विद्यार्थी कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या २२७० जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी २०६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात विद्यार्थी क्षमता २३ हजार ३९० आहे. मात्र यंदा केवळ २१ हजार १२० विद्यार्थी दहाव्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील अनेक विद्यार्थी आयटीआय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतील. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेणारे जेमतेम २० हजार विद्यार्थी असणार आहेत.शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने अनेक नवनवीन विद्यालये उघडण्यात येत आहेत. शिवाय बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे कामही केले जाते. अकरावीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ शाळा, वरिष्ठ महाविद्यालय संलग्न पाच शाळा, माध्यमिक शाळा संलग्न ११९, स्वतंत्र ३२, नगर परिषदेची एक, आश्रमशाळा १३, सैनिकी शाळा एक व स्वयंअर्थसहाय्याच्या २१ शाळांचा समावेश आहे. स्वतंत्र व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न शाळांतील ११ व्या वर्गात प्रत्येकी १००-१०० विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. तर इतर शाळांमध्ये प्रत्येकी ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता असते.जिल्ह्यात अकरावी कला शाखेच्या २०१ तुकड्या, विज्ञान शाखेच्या १३३ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६ तर कला व वाणिज्य मिळून संयुक्त शाखेच्या सात अशा एकूण ३५७ तुकड्या आहेत. कला शाखेची १२ हजार ८२० एवढी प्रवेश क्षमता, विज्ञान शाखेची नऊ हजार १००, वाणिज्य शाखेची एक हजार १६० व संयुक्त शाखेची ३१० अशी एकूण २३ हजार ३९० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. त्यातही दहावा वर्ग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल व त्यांचा प्रवेश झाला नसेल तर मुख्याध्यापक शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने २० विद्यार्थी वाढवू शकतात. त्यामुळे ३५७ तुकड्यांनुसार एकूण सात हजार १४० विद्यार्थी संख्या वाढविली जावू शकते. त्यामुळे ११ वीची प्रवेश क्षमता ३० हजार ५३० विद्यार्थी संख्येवर जावून पोहचते. मात्र विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी दहावा वर्ग उत्तीर्ण झाल्याने तुकडीनिहाय २० विद्यार्थी वाढविण्याची गरज यंदा पडणार नाही. उलट काही शाळांना यंदा अकराव्या वर्गासाठी विद्यार्थी मिळण्याची शक्यता कमीच आहे. विज्ञान शाखेत प्रवेशासाठी चढाओढजिल्ह्यात विज्ञान शाखेच्या १३३ तुकड्या आहेत. यात नऊ हजार १०० विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. बहुतांश आई-वडिलांची इच्छा आपल्या पाल्याने विज्ञानाचे शिक्षण घेवून डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनावे अशी असते. शिवाय आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढल्याने विद्यार्थ्यांचीसुद्धा याच शाखेत करियर करण्याची तयारी असते. त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही मोठाच प्रयत्न करतात. त्यामुळे दरवर्षी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने विज्ञान शाखेत विद्यार्थी संख्या वाढविण्याची पाळी मुख्याध्यापकांवर येते. दुसरीकडे कला शाखेत विद्यार्थ्यांचे प्रवेश अत्यल्प होत असल्यामुळे अनेक शाळांवर कला शाखा बंद करण्याचीसुद्धा पाळी ओढवते.स्वयंअर्थसहाय्य शाळांचा प्रश्नजिल्ह्यात अकरावीचे वर्ग असलेल्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची संख्या २१ आहे. या शाळांना शासनाकडून कसलेही अनुदान मिळत नाही. तसेच तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसुद्धा मिळत नाही. सन २०१३-१४ मध्ये या शाळांची संख्या १७ होती. मात्र त्यावर्षी दोन शाळांना मान्यता न मिळाल्याने त्या बंद पडल्या व १५ शाळा सुरू होत्या. यानंतर सन २०१४-१५ मध्ये आणखी सहा शाळांना मंजुरी मिळाल्याने त्यांची संख्या २१ झाली आहे. आता सन २०१५-१६ मध्ये आणखी काही शाळांना मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या संख्येत वाढ होवू शकते. शासनाकडून या शाळांना काहीही मिळत नसल्याने विद्यार्थी तेथे शिक्षण घेण्यास इच्छुक नसतात.