शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कमी पावसावर धूळ पेरणीचा पर्याय योग्य

By admin | Updated: July 1, 2014 23:31 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यापैकी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेचे क्षेत्र पाऊस आल्यानंतरचे आहे.

देवानंद शहारे - गोंदियाआतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यापैकी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेचे क्षेत्र पाऊस आल्यानंतरचे आहे. यापैकी २० ते २५ टक्के क्षेत्रातील म्हणजे जवळपास तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिका पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही वेळ येऊ नये आणि कमी पावसात अधिक उत्पन्न घेण्यासाठी धूळ पेरणी हा पर्याय चांगला असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सध्या पावसाच्या हुलकावणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नेमके काय केले पाहीजे याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी कुरील यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क करून त्यांचा सल्ला जाणून घेतला. सामान्यत: जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत रोवणी पूर्ण होणे आवश्यक असते. त्यावेळी रोवणी पूर्ण झाली तर रोपांना पावसाचा पूर्ण फायदा मिळतो. मात्र पाऊस कमी प्रमाणात पडला तर शक्यतो भात लागवडीत बदल करून खर्चात बचत व उत्पादनात वाढ करण्यासाठी धूळ पेरणी हा पर्याय आहे. यासाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात बिया अंकुरीत होईपर्यंत किंवा धूळ पेरणीद्वारे धानाची पेरणी तिफनीने करावी. यासाठी एकरी १५ ते २० किलोपर्यंत बियाणे पुरेशे होतात. पेरणीपूर्वी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मिठ (तीन टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करावे. त्यात बियाणे भिजवून ठेवावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके बियाणे चाळणीने काढावे. तळातील बियाणे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून २४ तास सावलीत वाळवावे. नंतर तीन ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रतिकिलो बियाणे अशी बीज प्रक्रिया करावी असे कुरील यांनी सांगितले.धूळ पेरणी केल्यास जमिनीची आर्द्रता व उष्णतेद्वारे बिया जोमाने अंकुरीत होतात. रोपे जोमदार असल्याने जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्याची प्रक्रिया जोमदारपणे होते. त्यामुळे उत्पन्नात १५ ते २० टक्के वाढ होते. जमीनही भूसभूसीत राहून रबी पिकासाठी कमी खर्चात जमीन तयार होते. या पद्धतीतून भात पिकांचे उत्पादन घेतल्यास चिखलणीद्वारे भात लागवड केलेल्या पिकांच्या तुलनेत किमान २० दिवस अगोदर पीक तयार होते. रबीसाठी उशिरा पडणाऱ्या पावसाचा फायदा या पिकांना होतो. ही पद्धत आवत्या भात पद्धतीची असून बदल फक्त तिफणीने पेरणीचा आहे. ही पद्धत वापरल्यास प्रतिकूल हवामानातही भाताचे उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांनी अनुभव म्हणून या पद्धतीचा अवलंब करावा. जून महिन्यात सिंदेवाही येथे पार पाडलेल्या विभागीय संशोधन व विस्तार परिषदेत कृषी तज्ज्ञांनी असाच सल्ला दिल्याचे कृषी अधीक्षक कुरील यांनी सांगितले. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पाच टक्के कमी राहण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्याची जून महिन्यात पावसाची सरासरी २०० मिमी इतकी आहे. त्या तुलनेत ११० मिमी इतकाच पाऊस झालेला आहे.