शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसावर धूळ पेरणीचा पर्याय योग्य

By admin | Updated: July 1, 2014 23:31 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यापैकी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेचे क्षेत्र पाऊस आल्यानंतरचे आहे.

देवानंद शहारे - गोंदियाआतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यापैकी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेचे क्षेत्र पाऊस आल्यानंतरचे आहे. यापैकी २० ते २५ टक्के क्षेत्रातील म्हणजे जवळपास तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिका पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही वेळ येऊ नये आणि कमी पावसात अधिक उत्पन्न घेण्यासाठी धूळ पेरणी हा पर्याय चांगला असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सध्या पावसाच्या हुलकावणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नेमके काय केले पाहीजे याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी कुरील यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क करून त्यांचा सल्ला जाणून घेतला. सामान्यत: जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत रोवणी पूर्ण होणे आवश्यक असते. त्यावेळी रोवणी पूर्ण झाली तर रोपांना पावसाचा पूर्ण फायदा मिळतो. मात्र पाऊस कमी प्रमाणात पडला तर शक्यतो भात लागवडीत बदल करून खर्चात बचत व उत्पादनात वाढ करण्यासाठी धूळ पेरणी हा पर्याय आहे. यासाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात बिया अंकुरीत होईपर्यंत किंवा धूळ पेरणीद्वारे धानाची पेरणी तिफनीने करावी. यासाठी एकरी १५ ते २० किलोपर्यंत बियाणे पुरेशे होतात. पेरणीपूर्वी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मिठ (तीन टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करावे. त्यात बियाणे भिजवून ठेवावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके बियाणे चाळणीने काढावे. तळातील बियाणे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून २४ तास सावलीत वाळवावे. नंतर तीन ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रतिकिलो बियाणे अशी बीज प्रक्रिया करावी असे कुरील यांनी सांगितले.धूळ पेरणी केल्यास जमिनीची आर्द्रता व उष्णतेद्वारे बिया जोमाने अंकुरीत होतात. रोपे जोमदार असल्याने जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्याची प्रक्रिया जोमदारपणे होते. त्यामुळे उत्पन्नात १५ ते २० टक्के वाढ होते. जमीनही भूसभूसीत राहून रबी पिकासाठी कमी खर्चात जमीन तयार होते. या पद्धतीतून भात पिकांचे उत्पादन घेतल्यास चिखलणीद्वारे भात लागवड केलेल्या पिकांच्या तुलनेत किमान २० दिवस अगोदर पीक तयार होते. रबीसाठी उशिरा पडणाऱ्या पावसाचा फायदा या पिकांना होतो. ही पद्धत आवत्या भात पद्धतीची असून बदल फक्त तिफणीने पेरणीचा आहे. ही पद्धत वापरल्यास प्रतिकूल हवामानातही भाताचे उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांनी अनुभव म्हणून या पद्धतीचा अवलंब करावा. जून महिन्यात सिंदेवाही येथे पार पाडलेल्या विभागीय संशोधन व विस्तार परिषदेत कृषी तज्ज्ञांनी असाच सल्ला दिल्याचे कृषी अधीक्षक कुरील यांनी सांगितले. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पाच टक्के कमी राहण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्याची जून महिन्यात पावसाची सरासरी २०० मिमी इतकी आहे. त्या तुलनेत ११० मिमी इतकाच पाऊस झालेला आहे.