शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्याने पीक लागवड खर्चात होणार वाढ

By admin | Updated: July 1, 2014 23:32 IST

प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना एकरी लागवड खर्च तीन ते चार हजार रूपयांनी वाढणार आहे. मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या.

काचेवानी : प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना एकरी लागवड खर्च तीन ते चार हजार रूपयांनी वाढणार आहे. मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने पेरण्या बिघडल्या असून पूर्ण मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत आहेत. मागील वर्षी मे महिन्याच्या २७ तारखेला पेरण्या होण्यायोग्य पाऊस पडले. अर्धवट शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या व ६ जूनच्या सायंकाळी ७.३० दरम्यान खूप पाऊस सुरु झाला. ६ जूनला दोन तास मोकळीकता दिल्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला तर २३ दिवसात तीन ते चार दिवस खंडीत पाऊस पडला व उर्वरीत पूर्ण दिवस भरपूर पाऊस पडला. मागील वर्षीचा संततधार पाऊस अविस्मरणीय राहणार आहे. त्यावेळी तीन महिन्याच्या (९० दिवस) काळात ७८ दिवस पाऊस पडले होता. तिरोडा तालुक्यात ९ वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली होती. सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पूर्वमशागत, पेरण्या, तुर आदी पिके शेतात लावण्याची वेळ पावसाने दिली नव्हती. या वर्षी रोहिणी नक्षत्र २५ मे रोजी लागताच पावसाने हजेरी लावली. तेव्हा शेतकऱ्यांनी कोणतीच पर्वा न करता पेरण्याचे कार्य झलाट्याने सुरु केले. आज काही अपवाद वगळता शंभर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.शेतकऱ्यांच्या शेतातील पेरण्यांना अंकुर आले. त्या वाढायला लागल्या आणि आता पावसाने पाठ फिरवली. चार दिवसात पडले नाही तर पेरण्या नाहिशा होणार आहेत.दोन वर्षापूर्वी शेतकरी स्वत:च्या घरचे धान्य बियाणे म्हणून वापरत असत. परंतु आता ९५ टक्क्याच्या वर शेतकऱ्यांनी संशोधित बियाण्यांची खरेदी करुन पेरण्या केलेल्या आहेत. एकरी १५०० ते हजार रुपयांचे बियाणे घेवून पेरण्या केल्या आहेत. पाऊस उशिरा आल्याने जमिनीखालच्या धानाला अंकुर आले आणि वरचे धान्य पाखरांनी उचलून खाल्ले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पेरण्या बिगडल्या आहेत. पेरण्या करण्यात आल्या त्यापैकी अधीक बिया नाकामी झालेल्या आहेत. पेरण्या बिगडल्याने आता शेतकरी दुबार पेरणी करायला लागले असल्याने एकरी दोन हजार रुपयांचा भुर्दंड त्यांच्यावर बसलेला आहे.शेतकऱ्यांना यावर्षी एकरी २१ ते २२ हजार रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी एकराला कमितकमी १६ ते १७ हजार रुपये लागत खर्च येत होता. पेरणीपूर्व मशागत, संशोधित बियाण्यांची खरेदी, पेरणी, नागरणी, रोवणी, खत, निंदाई, औषध फवारणी, कापणी, मळणी असे अनक कामे शेतकऱ्यांना करावे लागतात. एवढे काम केल्यानंतरही शेतकऱ्यांना भीतीच असते. कधी निसर्ग कोपतो तर कधी व्यापारी वर्ग धानाचा भाव घसरवून लुबाडतात. एकूण पाहता शेतकऱ्यांची स्थिती दयनिय असून शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.यावर्षी मजुरांच्या रोजीत भरपूर वाढ झाली आहे. मग्रारारोहयो कामावर भरपूर रोजी दिल्याने शेतकऱ्यांची फजिती झाली आहे. आजच्या परिस्थितीत मजूर वर्ग शेतात काम करायला तयार नाहीत. वाढती महागाई, वस्तुंच्या वाढलेल्या किमती, घसरते धानाचे भाव यामुळे शेतकरी कंटाळून गेलेला आहे. आजची शेती मुद्दाम परवडण्यासाखी राहिली नाही. त्यामुळे जमीन मालक शेती करायला नाकारत असून अधिया (बटई), ठेक्याने द्यायला तयार आहेत. जमीन उगावी म्हणून मोफत जमीन लावायला द्यायला तयार आहेत. मात्र जमिनीत स्वत: धान्य लावायला तयार होताना दिसून येत नाही. यावर्षी शेतकऱ्यांना शेतात धानाचे उत्पादन समाधानकारक होणार, असे चिन्ह मुद्दाम दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी प्रयत्न केले तरी निसर्ग साथ देणार, असे दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या गंभीर संकटाला लक्षात घेवून गावस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तराच्या महसूल विभगाने सतर्कता ठेवून शेतकऱ्यांच्या हितार्थ संरक्षणात्मक योजना आखण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)