शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

पाऊस लांबल्याने पीक लागवड खर्चात होणार वाढ

By admin | Updated: July 1, 2014 23:32 IST

प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना एकरी लागवड खर्च तीन ते चार हजार रूपयांनी वाढणार आहे. मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या.

काचेवानी : प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना एकरी लागवड खर्च तीन ते चार हजार रूपयांनी वाढणार आहे. मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने पेरण्या बिघडल्या असून पूर्ण मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत आहेत. मागील वर्षी मे महिन्याच्या २७ तारखेला पेरण्या होण्यायोग्य पाऊस पडले. अर्धवट शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या व ६ जूनच्या सायंकाळी ७.३० दरम्यान खूप पाऊस सुरु झाला. ६ जूनला दोन तास मोकळीकता दिल्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला तर २३ दिवसात तीन ते चार दिवस खंडीत पाऊस पडला व उर्वरीत पूर्ण दिवस भरपूर पाऊस पडला. मागील वर्षीचा संततधार पाऊस अविस्मरणीय राहणार आहे. त्यावेळी तीन महिन्याच्या (९० दिवस) काळात ७८ दिवस पाऊस पडले होता. तिरोडा तालुक्यात ९ वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली होती. सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पूर्वमशागत, पेरण्या, तुर आदी पिके शेतात लावण्याची वेळ पावसाने दिली नव्हती. या वर्षी रोहिणी नक्षत्र २५ मे रोजी लागताच पावसाने हजेरी लावली. तेव्हा शेतकऱ्यांनी कोणतीच पर्वा न करता पेरण्याचे कार्य झलाट्याने सुरु केले. आज काही अपवाद वगळता शंभर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.शेतकऱ्यांच्या शेतातील पेरण्यांना अंकुर आले. त्या वाढायला लागल्या आणि आता पावसाने पाठ फिरवली. चार दिवसात पडले नाही तर पेरण्या नाहिशा होणार आहेत.दोन वर्षापूर्वी शेतकरी स्वत:च्या घरचे धान्य बियाणे म्हणून वापरत असत. परंतु आता ९५ टक्क्याच्या वर शेतकऱ्यांनी संशोधित बियाण्यांची खरेदी करुन पेरण्या केलेल्या आहेत. एकरी १५०० ते हजार रुपयांचे बियाणे घेवून पेरण्या केल्या आहेत. पाऊस उशिरा आल्याने जमिनीखालच्या धानाला अंकुर आले आणि वरचे धान्य पाखरांनी उचलून खाल्ले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पेरण्या बिगडल्या आहेत. पेरण्या करण्यात आल्या त्यापैकी अधीक बिया नाकामी झालेल्या आहेत. पेरण्या बिगडल्याने आता शेतकरी दुबार पेरणी करायला लागले असल्याने एकरी दोन हजार रुपयांचा भुर्दंड त्यांच्यावर बसलेला आहे.शेतकऱ्यांना यावर्षी एकरी २१ ते २२ हजार रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी एकराला कमितकमी १६ ते १७ हजार रुपये लागत खर्च येत होता. पेरणीपूर्व मशागत, संशोधित बियाण्यांची खरेदी, पेरणी, नागरणी, रोवणी, खत, निंदाई, औषध फवारणी, कापणी, मळणी असे अनक कामे शेतकऱ्यांना करावे लागतात. एवढे काम केल्यानंतरही शेतकऱ्यांना भीतीच असते. कधी निसर्ग कोपतो तर कधी व्यापारी वर्ग धानाचा भाव घसरवून लुबाडतात. एकूण पाहता शेतकऱ्यांची स्थिती दयनिय असून शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.यावर्षी मजुरांच्या रोजीत भरपूर वाढ झाली आहे. मग्रारारोहयो कामावर भरपूर रोजी दिल्याने शेतकऱ्यांची फजिती झाली आहे. आजच्या परिस्थितीत मजूर वर्ग शेतात काम करायला तयार नाहीत. वाढती महागाई, वस्तुंच्या वाढलेल्या किमती, घसरते धानाचे भाव यामुळे शेतकरी कंटाळून गेलेला आहे. आजची शेती मुद्दाम परवडण्यासाखी राहिली नाही. त्यामुळे जमीन मालक शेती करायला नाकारत असून अधिया (बटई), ठेक्याने द्यायला तयार आहेत. जमीन उगावी म्हणून मोफत जमीन लावायला द्यायला तयार आहेत. मात्र जमिनीत स्वत: धान्य लावायला तयार होताना दिसून येत नाही. यावर्षी शेतकऱ्यांना शेतात धानाचे उत्पादन समाधानकारक होणार, असे चिन्ह मुद्दाम दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी प्रयत्न केले तरी निसर्ग साथ देणार, असे दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या गंभीर संकटाला लक्षात घेवून गावस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तराच्या महसूल विभगाने सतर्कता ठेवून शेतकऱ्यांच्या हितार्थ संरक्षणात्मक योजना आखण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)