शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

डांगोरली बॅरेजचा प्रस्ताव शासनाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा प्रस्ताव आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाला सादर केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातच त्यांनी ...

गोंदिया : बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा प्रस्ताव आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाला सादर केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातच त्यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत डांगोरली बॅरेजचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लावून धरला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले होते.

डांगोरली बॅरेज हा आंतरराज्य प्रकल्प असून, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेतून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात डांगोरली येथे उच्चपातळी बंधारा निर्माण करून बांधण्यात येणार आहे. आमदार अग्रवाल यांनी या बॅरेजची उंची ८ मीटर ठेवण्यासंबंधी आग्रह केला होता. ज्यामुळे तेढवा-सिवनी व नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण होणार आहे.

डांगोरली बॅरेजमुळे उपलब्ध पाणीसाठा १०.९१ एमएमक्यूब राहणार असून, हजारो हेक्टर शेतजमिनीच्या सिंचन प्रकल्पांचे बळकटीकरण होण्यास मदत मिळणार आहे.

मात्र कोरोनामुळे बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा विषय पूर्णत्वास जाऊ शकला नाही. अखेर आमदार अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरत नागपूर सिंचन भवन येथे सिंचन विभागाच्या २४ डिसेंबरच्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता. काही दिवसांपूर्वी बॅरेजचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. तसेच जलसंपदा विभागाचे सचिव विजय गौतम यांची भेट घेऊन मंजुरी देण्याची मागणी केली होती. अखेर बहुप्रतीक्षित डांगोरली बॅरेजचा प्रश्न मार्गी लागणार असून, क्षेत्रातील कृषी तसेच पिण्याच्या पाण्याचा उद‌्भवणारा प्रश्न सुटणार आहे.

------------------------

उपसा सिंचन योजनांचे होणार बळकटीकरण

डांगोरली बॅरेजमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नवेगाव-देवरी व तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण होणार असून, याचा फायदा रब्बी पिकांसाठी घेता येईल व हजारो हेक्टर शेतीला याचा फायदा होईल. सोबतच महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणाऱ्या जुन्या वाघनदीच्या पुलामध्ये २ मीटर भराव टाकल्यास रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण होईल व त्यासाठी स्वतंत्र बंधारा बांधण्याची गरजच भासणार नाही. यामुळे शासनाचा पैसादेखील वाचेल, असे आमदार अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे होत असल्याने पाण्याची पूर्तता होऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून सध्या पुजारीटोला धरणातून नदीत पाणी सोडून त्या पाण्याचा उपसा डांगोरली येथून केला जातो. डांगोरली बॅरेज तयार केल्याने कोणत्याही इतर धरणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही व एकमेव डांगोरली बॅरेज येथून पाण्याचा पुरवठा संपूर्ण गोंदिया शहराला केला जाणार आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी गोंदिया शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे.