शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी

By admin | Updated: May 1, 2016 01:48 IST

प्रत्येक वर्षी एप्रिल मे जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव जाणवतो. उष्माघाताने मृत्यूही होत असतो.

तापमानात वाढ : शासकीय डॉक्टरांचे आवाहनकेशोरी : प्रत्येक वर्षी एप्रिल मे जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव जाणवतो. उष्माघाताने मृत्यूही होत असतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासून जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. उष्माघात होण्याची प्रमुख कारणांमध्ये उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, वाढत्या तापमानाशी सतत संबध येण्याचे कारणाने उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे लकवा मारणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोळे दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन, अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे असू शकतात. वाढत्या तापमानात फार वेळ कष्ठाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर व संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाची कपडे वापरू नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावीत, जलसंजीवनाचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत द्यावे, अधूनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी.उष्माघाताची लक्षणे सुरू होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरू करावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा याचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, रुग्णाच्या खोलीत पंखे, कुलर सुरू ठेवावेत किंवा वातानुकूलीत खोलीत ठेवावेत, रुग्णांचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्यात आदी उपचाराचे प्रयत्न करावा. (वार्ताहर)