शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

बापू, तुम्हीच खरं सांगा...

By admin | Updated: July 19, 2015 01:29 IST

गोंदिया जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत झालेली काँग्रेस-भाजप युती सध्या जिल्ह्यातच नाही तर राज्यातील एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत झालेली काँग्रेस-भाजप युती सध्या जिल्ह्यातच नाही तर राज्यातील एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी अतिशय गांभिर्याने घेतलेल्या या विषयात आता काय होणार, अशी उत्सुकता जशी सर्वत्र निर्माण झालेली आहे तशीच या घडामोडी घडवून आणण्यासाठी कोणी-कोणी पुढाकार घेतला याचाही शोध पक्षातर्फे घेतला जात आहे. त्यामुळे या विषयात पुढे काय व्हायचे ते होवो, तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विषय आहे. पण ज्या काही घडामोडी या निमित्ताने घडत गेल्या त्यातील एकेक किस्से आता समोर येऊ लागले आहेत.आमगाव विधानसभा क्षेत्रातील विद्यमान भाजप आमदार संजय पुराम यांच्या पत्नी सविता पुराम आणि काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांची कन्या सुषमा राऊत या दोघींनाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे भाजपच्या सविता पुराम यांना काँग्रेसच्या उषा शहारे यांनी तर काँग्रेसच्या सुषमा राऊत यांना भाजपच्या सरिता रहांगडाले यांनी पराभवाची धूळ चाखली. या दोन्ही लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या दोन्ही लक्षवेधी लढतींमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातच लढाई झाली. गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेत सभापतीपदी विराजमान असणाऱ्या सविताताईंसाठी त्यांचे पतीदेव आ. संजय पुराम यांनी काँग्रेस उमेदवाराविरूद्ध निवडणूक प्रचारादरम्यान केलेली आगपाखड तेथील मतदारांच्या चांगलीच ध्यानीमनी आहे, एवढेच नाही, तर माजी आमदार रामरतनबापू राऊत यांनी आपल्या कन्येला निवडून देण्याचे आवाहन करताना भाजप उमेदवाराविरूद्ध केलेला प्रचारही मतदारराजा विसरलेला नाही. निवडणुकीतील ही लढाई व्यक्तीविरूद्धची निश्चितच नसते, ती लढाई दोन पक्षातील, त्यांच्या तत्त्वांविरूद्धची असते. मात्र दोन राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते मतदारांपुढे जातात तेव्हा एकमेकांच्या पक्षांचे उणेदुणे बाहेर काढायला समोरचा प्रतिस्पर्धी मागेपुढे पाहात नाही. असे असताना प्रतिष्ठेच्या या लढाईत ज्या उमेदवाराने आपल्या कन्येला किंवा आपल्या पत्नीला पराभवाची धूळ चाखली त्या उमेदवाराला सत्तेसाठी ‘आपले’ म्हणवून घेताना त्या नेत्यांचे अंत:करण खरंच परवानगी देते का, याबाबत शंका आल्याशिवाय राहात नाही. ज्या रामरतनबापूंच्या घरात काँग्रेसच्या तत्वांची परंपरा आतापर्यंत जपण्यात आली, ज्या बापूंना सात महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाकडून पराभवाला तोंड द्यावे लागले त्याच पक्षासोबत हातमिळवणी करताना काहीच वाटले नसेल का? पंचायत समितीत असो किंवा जिल्हा परिषदेत असो, काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपशी घरोबा करावा यासाठी रामरतनबापूंनी स्वमर्जीने आपली ‘नाहरकत’ दिली असेल यावर विश्वास बसत नाही. कधीकधी एखादी लाट आली की त्यात अनेक गोष्टी वहावत जातात. पण रामरतनबापूंसारख्या मुरब्बी नेत्यानेही यात वहावत जावे, ही गोष्टी निश्चितच सर्वांना खटकणारी अशी आहे. या घडामोडींवर शेवटी एकच विचारावेसे वाटते, ‘बापू, तुम्हीच खरं सांगा, या घडामोडी तुमच्या मर्जीने झाल्या का?.. भाजपशी केलेला घरोबा तुम्हाला मान्य आहे का?’