शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

खासदारांच्या दत्तक गावाला सिंचनाची आस

By admin | Updated: December 27, 2014 22:52 IST

गोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे

पटेलांचा पुढाकार : गावकऱ्यांना हवे शेतीला पाणी, हाताला काम अन् घामाला दाममनोज ताजने - गोंदियागोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहीले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती, पण माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्नं पडू लागली. ‘लोकमत’ने या गावात जाऊन तेथील विविध स्तरातील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या.पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. पण गावातील सामाजिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांच्यात कधीही धार्मिक, जातीय तेढ निर्माण झालेली नाही. गावातील कोणतेही भांडण-तंटे गावातच मिटविण्याचा येथील प्रघात आहे. बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना उपजीविकेसाठी गाव सोडून जावे लागले. कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देऊनही त्या प्रकल्पाचे पाणी या गावकऱ्यांना मिळू शकत नाही ही येथील गावकऱ्यांची सर्वात मोठी खंत आहे. कारण हे गाव आणि लगतच्या शेतजमिनी उंच आहे तर प्रकल्पाचे स्थळ खालच्या भागाला आहे. त्यामुळे गावात थेट पाणी पोहोचू शकत नाही. मात्र लिफ्ट करून (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेताला द्यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरीतील शेतकरी रबी हंगामातही धानाचे पिक घेऊन संपन्न होतील, अशी त्यांना आशा आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळत नसेल तर शेतकऱ्यांच्या शेतात शासनाने बोर करून द्यावी अशी अपेक्षा शिवाजी सोनेवाने यांनी व्यक्त केली.या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात आहे. गावात जलस्वराज्य प्रकल्पातून आधी एक पाण्याची टाकी तयार केली होती. पण ती अपुरी पडत असल्याने ७४ लाख रुपये खर्चुन नवीन टाकी तयार करण्यात आली. मात्र त्या टाकीला साजेशी पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे जुन्याच पाईपलाईनवरून काम भागविले जात आहे. नवीन पाईपलाईन टाकल्यास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल, असे माजी उपसरपंच भरत ठाकूर यांनी सांगितले. गावातील काही हातपंप चालू तर काही बंद स्थितीत आहेत. विशेष म्हणजे गावातील काही विहिरी आणि त्यावरील हातपंपाचे पाणी खारे आहे. ते पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गांची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी १ किलोमीटरवर असलेल्या कुऱ्हाडी गावात जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रही कुऱ्हाडीत आहे. एक किलोमीटरचे अंतर पार करताना गावकऱ्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र गावातील रस्ते, नाल्यांची दुरूस्ती करण्यासाठी बराच वाव आहे. तुटफूट झालेले, उखडलेले रस्ते दुरूस्त केल्यास आणि नाल्यांची योग्य बांधणे करून सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केल्यास या गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. प्रफुल्ल पटेलांसारख्या मोठ्या नेत्याने हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.