शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

कुटुंब नियोजनानंतरही ५३० महिलांना गर्भधारणा

By admin | Updated: March 9, 2016 02:46 IST

लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास प्रोत्साहन दिले.

नरेश रहिले गोंदियालोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास प्रोत्साहन दिले. दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी म्हणून तिसऱ्या अपत्याला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असाही नियम करण्यात आला आहे. मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारी यंत्रणाच अपयशी ठरल्याने शस्त्रक्रिया करणाऱ्या ५३० महिला मागील पाच वर्षात गर्भवती झाल्या आहेत. नाईलाजाने त्यांचा गर्भपात करण्यात आला.शासन आरोग्य विभागाला कुटुंब नियोजनाचे दरवर्षी उद्दिष्ट देते. परंतु गेल्या पाच वर्षात अयशस्वी झालेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण पाहता आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आपल्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरले, की कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या नोंदीच बोगस घेण्यात आल्या, अशी शंका येते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना नियुक्त करण्यात येते. परंतु शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गर्भधारणा झाल्याने त्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी केल्या की सामान्य उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केल्या, ही बाब स्पष्ट होत नाही. गर्भनिरोधक उपाय ठरले फोलगर्भनिरोधक साहित्याची जाहिरात शासन मोठ्या प्रमाणात करते. गर्भनिरोधक साहित्याचा वापर करून सुरक्षित राहण्याचा सल्ला जाहीरात व पत्रकाच्या माध्यमातून केला जात असला तरी हे गर्थनिरोधक उपाय फोल ठरले आहेत. गर्भनिरोधक साहित्याचा वापर केल्यावरही पाच वर्षात जिल्ह्यातील ३ हजार ८० महिला गर्भवती झाल्या आहेत. त्यात सन २०११-१२ या वर्षात २२१ महिला, सन २०१२-१३ मध्ये ७२३, सन २०१३-१४ मध्ये ७७५, सन २०१४-१५ मध्ये ७२१ तर २०१५-१६ च्या दहा महिन्यात ६४० अशा ३०८० महिलांचा समावेश आहे.तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव शासनाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट्य आरोग्य विभागाला दिले. वर्षाकाठी ९ हजारांपेक्षा अधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट शासन देते. परंतु त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे फक्त दोनच डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर यांनी दिली आहे. २०१२-१३ मध्ये सर्वात बोगस शस्त्रक्रियाशस्त्रक्रियीनंतरही गर्भधारणा झालेल्या महिलांनी परवानाप्राप्त केंद्रातून गर्भपात केला. त्यात सन २०११-१२ या वर्षात १११ महिला, सन २०१२-१३ मध्ये १६७, सन २०१३-१४ मध्ये ९१, सन २०१४-१५ मध्ये ४७ तर २०१५-१६ च्या १० महिन्यात १४ महिलांचा समावेश आहे. या प्रकारावरून शासनाच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया उपक्रमाकडे किती लक्ष आहे हे शासकीय आकडेवारीवरूनच लक्षात येते.