शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२६ गावातील कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत

By admin | Updated: November 30, 2014 23:07 IST

सडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत.

राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनीसडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत.सडक/ अर्जुनी तालुक्यातील राका, सडक/अर्जुनी, दल्ली, बाम्हणी/खडकी, मनेरी, कनेरी, कोसमतोंडी, पांढरी, रेंगेपार, सिंदीपार, गोंगले, हेटी, गिरोला, पांढरवाणी, केसलवाडा, शेंडा, वडेगाव, जांभळी, दोडके, डव्वा, बिंद्राबन, खजरी, घोटी, मुरपार, माऊली, बोपाबोडी या गावात बंधाऱ्याची सोय शासनाने करून दिली. पण शासनाची योजना चालविणारे अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक बंधारे आजघडीला पांढरे हत्ती बनले आहेत. लाखो रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. या योजनेत व अधिकारी मालामाल झाले. पण शेतकऱ्यांचे शेतीचा सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. शेतीच्या सिंचनाबरोबर पाळीव व जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती. पण त्या बंधाऱ्याजवळ १ फुट पाणी राहत नसल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे. वडेगाव/सडक गावाजवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ या ठिकाणी गेल्या १० वर्षापूर्वी दोन मोठे-मोठे बंधारे बंधाऱ्यात आले. ज्या दिवसापासून या बंधाऱ्याच्या पाट्या काढल्या. त्यानंतर त्या पूर्ण पाट्या चोरीला गेल्या. तेव्हापासून पुन्हा पाट्या लावण्यात आल्या नाही. या दोन्ही बंधाऱ्यामुळे केसलवाडा, पांढरवाणी, वडेगाव, रेंगेपार, डोयेटोला या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असती पण अधिकाऱ्यांचे नियोजनाचे अभाव व नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरली. योजनेत भ्रष्ट्राचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराचे प्रमाणही कमी होईल व ती योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हिताची होईल.राका येथील कोल्हापुरी बंधारा तालुक्यातील प्रथम क्रमाकांचा बंधारा म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षापासून या बंधाऱ्यात पाट्या लावून दार बंद केल्या जात होते. त्यात १० ते २० फुट पाणी दरवर्षी साठवण राहात होते. गेल्या पावसाळ्यात चोरांनी पाट्या चोरल्यामुळे पाट्या लावल्या गेल्या नाहीत. या ठिकाणी नवीन पाट्या लावून पाणी अडवायला पाहिजे होते. पण पाट्या लावण्यास कोणताही अधिकारी धजावला नाही. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात नदीला पाणी अडवीले पाहिजे. पाट्या नसल्यामुळे यंदा राका बंधारा कोरडाच राहण्याचे चित्र दिसत आहे. राका येथील बंधााऱ्यामुळे सौंदड, राका, चिखली, पिपरी गावातील विहिरींना पाण्याचा स्तर वाढला होता. सध्या स्थितीत राका परिसरातील विहिरींचा जलस्तर खालवण्याची माहिती राजाराम ब्राह्मणकर या शेतकऱ्यांनी दिली. येणाऱ्या काळात पाण्याचा साठा वाढवायचा असेल तर तालुक्यातील सर्वच बंधाऱ्याची डागडूजी करून ते बंधारे विकासाचे प्रवाहात आणण्याची गरज आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची योजना शेतकऱ्यांसाठी फारच तारक आहे. या योजनेमुळे तालुक्यातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल. खरीप व रबी पिके घेऊ शकतो, पण सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा खालावत आहे.