शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२१ विदेशी पर्यटकांची व्याघ्र प्रकल्पाला भेट

By admin | Updated: November 30, 2014 23:05 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे

प्रचार-प्रसाराचा अभाव : जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हकपिल केकत - गोंदियानवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्यात २१ हजारच्या वर विदेशी पर्यटक भेट देत आहेत. तर गोंदियातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला या वर्षात फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यातून वन विभागासह जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याची वाघाची गुहा म्हणून ओळख आहे. पर्यटक येथे आल्यास वाघोबाचे हमखास दर्शन होतेच असा अनुभव आहे. हीच बाब हेरून शासनाने १२ डिसंबर २०१३ नागझिराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देत नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा केली. ६५३.६७ स्क्वेअर किमी. क्षेत्र असलेल्या या जंगलात वाघोबांचा वास आहे व त्याचे दर्शनही पर्यटकांना होतात. राष्ट्रीय स्तरावर नागझिराची ओळख व ख्याती असल्याने मोठ्या संख्येत पर्यटक दरवर्षी येथे येतात. मात्र जागतिक स्तरावर बघायचे झाल्यास नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नसल्याचे दिसते. याचे कारण असे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्य प्रख्यात आहे. येथे सन २०१३-१४ या वर्षात २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती आहे. तर या वर्षात नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. यात मे महिन्यात १०, जून महिन्यात एक तर आॅक्टोबर महिन्यात १० विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे, यापूर्वी विदेशी पर्यटक येथे आल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे नाही. विशेष म्हणजे, कान्हा केसलीला जाण्यासाठी बालाघाट होत जावे लागते. बहुतांश विदेशी पर्यटक अगोदर नागपूरवरून गोंदिया होतच बालाघाट व तेथून कान्हा केसलीला गेले असतील. शिवाय कान्हा केसलीला आल्यावर त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती न मिळणे हीच आश्चर्याची व व्यापक प्रचार-प्रसारातील उणिवेची बाब पुढे येते. येथून सुमारे १५० किमी. अंतरावर असलेल्या कान्हा केसलीला २१ हजार विदेशी पर्यटक भेट देत असून जवळील व्याघ्र प्रकल्पाबाबत ते येत नसल्याने ते याबाबत अनभिक्ष असल्याचे स्पष्ट होते. अशात येथील वनविभाग व जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. तर राज्य शासन सुद्धा येथे कोठेतरी कमकुवत पडत असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीचे कार्य जिल्हा पर्यटन समितीक डून केले जाते. मात्र एक वर्ष लोटूनही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची जागतिक पातळीवर पाहिजे तशी प्रसिद्धी होऊ शकली नाही यांची खंत ही वाटते. वनविभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन बुकींगच्या माध्यमातून आता कोठे या व्याघ्र प्रकल्पाबाबत पर्यटकांना माहिती मिळू लागली आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धीसाठी प्रयत्न होऊ शकले नाही व त्यामुळेच व्याघ्र प्रकल्प विदेशी पर्यटक व त्यांच्याकडून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकला हे सुद्धा तेवढेच खरे आहे.