शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

२१ विदेशी पर्यटकांची व्याघ्र प्रकल्पाला भेट

By admin | Updated: November 30, 2014 23:05 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे

प्रचार-प्रसाराचा अभाव : जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हकपिल केकत - गोंदियानवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्यात २१ हजारच्या वर विदेशी पर्यटक भेट देत आहेत. तर गोंदियातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला या वर्षात फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यातून वन विभागासह जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याची वाघाची गुहा म्हणून ओळख आहे. पर्यटक येथे आल्यास वाघोबाचे हमखास दर्शन होतेच असा अनुभव आहे. हीच बाब हेरून शासनाने १२ डिसंबर २०१३ नागझिराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देत नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा केली. ६५३.६७ स्क्वेअर किमी. क्षेत्र असलेल्या या जंगलात वाघोबांचा वास आहे व त्याचे दर्शनही पर्यटकांना होतात. राष्ट्रीय स्तरावर नागझिराची ओळख व ख्याती असल्याने मोठ्या संख्येत पर्यटक दरवर्षी येथे येतात. मात्र जागतिक स्तरावर बघायचे झाल्यास नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नसल्याचे दिसते. याचे कारण असे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्य प्रख्यात आहे. येथे सन २०१३-१४ या वर्षात २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती आहे. तर या वर्षात नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. यात मे महिन्यात १०, जून महिन्यात एक तर आॅक्टोबर महिन्यात १० विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे, यापूर्वी विदेशी पर्यटक येथे आल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे नाही. विशेष म्हणजे, कान्हा केसलीला जाण्यासाठी बालाघाट होत जावे लागते. बहुतांश विदेशी पर्यटक अगोदर नागपूरवरून गोंदिया होतच बालाघाट व तेथून कान्हा केसलीला गेले असतील. शिवाय कान्हा केसलीला आल्यावर त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती न मिळणे हीच आश्चर्याची व व्यापक प्रचार-प्रसारातील उणिवेची बाब पुढे येते. येथून सुमारे १५० किमी. अंतरावर असलेल्या कान्हा केसलीला २१ हजार विदेशी पर्यटक भेट देत असून जवळील व्याघ्र प्रकल्पाबाबत ते येत नसल्याने ते याबाबत अनभिक्ष असल्याचे स्पष्ट होते. अशात येथील वनविभाग व जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. तर राज्य शासन सुद्धा येथे कोठेतरी कमकुवत पडत असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीचे कार्य जिल्हा पर्यटन समितीक डून केले जाते. मात्र एक वर्ष लोटूनही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची जागतिक पातळीवर पाहिजे तशी प्रसिद्धी होऊ शकली नाही यांची खंत ही वाटते. वनविभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन बुकींगच्या माध्यमातून आता कोठे या व्याघ्र प्रकल्पाबाबत पर्यटकांना माहिती मिळू लागली आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धीसाठी प्रयत्न होऊ शकले नाही व त्यामुळेच व्याघ्र प्रकल्प विदेशी पर्यटक व त्यांच्याकडून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकला हे सुद्धा तेवढेच खरे आहे.