शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

२१ विदेशी पर्यटकांची व्याघ्र प्रकल्पाला भेट

By admin | Updated: November 30, 2014 23:05 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे

प्रचार-प्रसाराचा अभाव : जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हकपिल केकत - गोंदियानवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्यात २१ हजारच्या वर विदेशी पर्यटक भेट देत आहेत. तर गोंदियातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला या वर्षात फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यातून वन विभागासह जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याची वाघाची गुहा म्हणून ओळख आहे. पर्यटक येथे आल्यास वाघोबाचे हमखास दर्शन होतेच असा अनुभव आहे. हीच बाब हेरून शासनाने १२ डिसंबर २०१३ नागझिराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देत नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा केली. ६५३.६७ स्क्वेअर किमी. क्षेत्र असलेल्या या जंगलात वाघोबांचा वास आहे व त्याचे दर्शनही पर्यटकांना होतात. राष्ट्रीय स्तरावर नागझिराची ओळख व ख्याती असल्याने मोठ्या संख्येत पर्यटक दरवर्षी येथे येतात. मात्र जागतिक स्तरावर बघायचे झाल्यास नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नसल्याचे दिसते. याचे कारण असे की, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली अभयारण्य प्रख्यात आहे. येथे सन २०१३-१४ या वर्षात २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती आहे. तर या वर्षात नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला फक्त २१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. यात मे महिन्यात १०, जून महिन्यात एक तर आॅक्टोबर महिन्यात १० विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे, यापूर्वी विदेशी पर्यटक येथे आल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे नाही. विशेष म्हणजे, कान्हा केसलीला जाण्यासाठी बालाघाट होत जावे लागते. बहुतांश विदेशी पर्यटक अगोदर नागपूरवरून गोंदिया होतच बालाघाट व तेथून कान्हा केसलीला गेले असतील. शिवाय कान्हा केसलीला आल्यावर त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती न मिळणे हीच आश्चर्याची व व्यापक प्रचार-प्रसारातील उणिवेची बाब पुढे येते. येथून सुमारे १५० किमी. अंतरावर असलेल्या कान्हा केसलीला २१ हजार विदेशी पर्यटक भेट देत असून जवळील व्याघ्र प्रकल्पाबाबत ते येत नसल्याने ते याबाबत अनभिक्ष असल्याचे स्पष्ट होते. अशात येथील वनविभाग व जिल्हा पर्यटन समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. तर राज्य शासन सुद्धा येथे कोठेतरी कमकुवत पडत असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीचे कार्य जिल्हा पर्यटन समितीक डून केले जाते. मात्र एक वर्ष लोटूनही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची जागतिक पातळीवर पाहिजे तशी प्रसिद्धी होऊ शकली नाही यांची खंत ही वाटते. वनविभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन बुकींगच्या माध्यमातून आता कोठे या व्याघ्र प्रकल्पाबाबत पर्यटकांना माहिती मिळू लागली आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धीसाठी प्रयत्न होऊ शकले नाही व त्यामुळेच व्याघ्र प्रकल्प विदेशी पर्यटक व त्यांच्याकडून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकला हे सुद्धा तेवढेच खरे आहे.