शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

१३ वर्षांत केल्या १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या

By admin | Updated: December 3, 2014 22:51 IST

कर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.

नरेश रहिले - गोंदियाकर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचे सावट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राहते. यामुळे सतत नापिकी होत असते. महागडी औषधी व बियाणे वापरून येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंब सावरणे कठिण होत आहे. धानाला भाव शासनाकडून मिळत नाही. निवडणुका पाहून बोनस दिला जातो. निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाठ फिरविली जाते. मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कर्जातच जन्मलेल्या शेतकऱ्याला कर्जातच मरावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नसल्यामुळे राबूनही त्याला योग्य मोबदला मिळत नाही. परिणामी प्रत्येक काम त्याला कर्ज घेऊनच करावे लागते. एकदा घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणे शक्य नाही आणि दुसऱ्या वर्षीही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. परिणामी तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो. यामुळेच जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत. सन २००२ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सन २००३ मध्ये एक, सन २००४ मध्ये सहा, सन २००५ मध्ये सहा, सन २००६ मध्ये २२, सन २००७ मध्ये १९, सन २००८ मध्ये १८, सन २००९ मध्ये १२, सन २०१० मध्ये २२, सन २०११ मध्ये १३, सन २०१२ मध्ये १०, सन २०१३ मध्ये सहा तर सन २०१४ मध्ये १४ अशा एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या १३ वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४४ शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी नसल्याचे सांगून त्यांच्या कुटुंबियांना मदतीपासून वंचीत ठेवले. १०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी असल्याचे सांगीतले. तर एका शेतकऱ्याची आत्महत्या कर्जापायी आहे किंवा नाही याची पडताळणी शासन करीत आहे. कर्जापायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून शासनातर्फे एक लाख रूपये देण्यात येते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कर्जापायी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना एक लाख रूपयाप्रमाणे एक कोटी पाच लाख रूपये या १३ वर्षात देण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)