शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

१३ वर्षांत केल्या १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या

By admin | Updated: December 3, 2014 22:51 IST

कर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.

नरेश रहिले - गोंदियाकर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचे सावट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राहते. यामुळे सतत नापिकी होत असते. महागडी औषधी व बियाणे वापरून येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंब सावरणे कठिण होत आहे. धानाला भाव शासनाकडून मिळत नाही. निवडणुका पाहून बोनस दिला जातो. निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाठ फिरविली जाते. मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कर्जातच जन्मलेल्या शेतकऱ्याला कर्जातच मरावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नसल्यामुळे राबूनही त्याला योग्य मोबदला मिळत नाही. परिणामी प्रत्येक काम त्याला कर्ज घेऊनच करावे लागते. एकदा घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणे शक्य नाही आणि दुसऱ्या वर्षीही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. परिणामी तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो. यामुळेच जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत. सन २००२ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सन २००३ मध्ये एक, सन २००४ मध्ये सहा, सन २००५ मध्ये सहा, सन २००६ मध्ये २२, सन २००७ मध्ये १९, सन २००८ मध्ये १८, सन २००९ मध्ये १२, सन २०१० मध्ये २२, सन २०११ मध्ये १३, सन २०१२ मध्ये १०, सन २०१३ मध्ये सहा तर सन २०१४ मध्ये १४ अशा एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या १३ वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४४ शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी नसल्याचे सांगून त्यांच्या कुटुंबियांना मदतीपासून वंचीत ठेवले. १०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी असल्याचे सांगीतले. तर एका शेतकऱ्याची आत्महत्या कर्जापायी आहे किंवा नाही याची पडताळणी शासन करीत आहे. कर्जापायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून शासनातर्फे एक लाख रूपये देण्यात येते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कर्जापायी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना एक लाख रूपयाप्रमाणे एक कोटी पाच लाख रूपये या १३ वर्षात देण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)