शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट

By admin | Updated: April 25, 2017 00:43 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरिपासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

‘जीडीसीसी’ने केली सुरूवात : गेल्या वर्षीच्या तुलनेत खरिपाचे कर्जवाटप घटणारगोंदिया : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरिपासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. कर्जवाटपात दरवर्षीच जिल्हा बँक अग्रेसर राहाते. मात्र गेल्या आर्थिक वर्षात कर्जवसुलीचे प्रमाण घटले. त्यामुळे यंदा कर्जवाटपाचे टार्गेट वाढवून घेण्याऐवजी अंशत: कमी करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७ लाख रूपयांचे कर्जवाटप झाल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. धानाचे कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ख्याती असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाचा बेभरोसा हे यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येते. आर्थिक सक्षमता नसल्यामुळे येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच कायम असते. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच नाही तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. असे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेची शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता यामुळे जिल्हा बँक अनेक वेळा ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. जिल्हा बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. १ एप्रिलपासून बँकेने कर्जवाटपाला सुरूवात केली असून आतापर्यंत १७ लाख रूपयांचे कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू होताच कर्जवाटपाच्या कामाला वेग येणार आहे. (शहर प्रतिनिधी)कर्जवसुलीअभावी टार्गेट कमीमागील वर्षी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १२६.५० कोटींचे कर्जवाटपाचे टार्गेट होते. त्यात ११२.८८ कोटी कर्जवाटप करण्यात आले. मात्र ७१.४९ कोटींचीच कर्जवसुली झाली होती. कर्जवसुलीचे प्रमाण कमी असल्याने बँक ेने यंदा कर्जवाटपाचा जास्त बोझा घेऊन त्यात बाधा येवू नये याकरिता टार्गेट कमी करवून घेतले. यामुळे यंदा बँकेला ११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट देण्यात आले आहे. यंदा घेतलेल्या टार्गेटनुसार बँकेने त्यासाठी व्यवस्था करून घेतली असून कर्जवाटपात अडचण येवू नये यासाठी टार्गेट कमी केल्याचे सांगण्यात आले.२६ कोटी बँकेकडेच पडूननोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जमा झालेले २६ कोटी रूपये अजूनही बँकेकडेच पडून आहेत. एवढी मोठी रक्कम पडून असल्याने साहजिकच आर्थिक परिणाम जाणवतो. मात्र कर्जवाटपावर याचा परिणाम पडू नये यासाठी जिल्हा बँकेने मार्ग काढला आहे. जिल्हा बँक नाबार्डकडून १०० कोटी कर्ज घेणार आहे. यातून बँक मागील कर्जाचे ४० कोटी फेडणार व त्यातून ६० कोटी रूपये शिल्लक राहतील. शिवाय बँकेने केलेल्या कर्जवसुलीतून उर्वरित कर्जवाटपाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळेच २६ कोटींची रक्कम पडून असतानाही बँकेला कर्जवाटपात अडचण फारसी अडचण येणार नसल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.