शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

१५ महिन्यांत आढळले पाण्याचे १०८५ दूषित नमुने

By admin | Updated: April 30, 2017 00:49 IST

जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे.

५०१८ नमुन्यांची तपासणी : ग्रामीण भागातील स्रोत सर्वाधिक दूषितगोंदिया : जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे. या दुषित नमुन्यांसाठी ग्रामपंचायत व नगर परिषद प्रशासन जबाबदार ठरत आहे. जिल्हा प्रयोगशाळेत सन २०१६ मध्ये ग्रामीण भागातील १७७८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५०५ नमुने दुषित असल्याचे लक्षात आले. तर शहरी भागातील १७५४ नमुने तपासण्यात आले असून यातील २०० नमुने दुषित असल्याचे आढळले. सन २०१७ च्या जानेवारी महिन्यात ग्रामीण भागातील १६८ नमुने तपासले असून त्यातील ४८ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील१७५ नमुने तपासले असून १२ नमुने दुषित असल्याचे आढळले. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागातील २८९ नमुने तपासले असून त्यातील ९४ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील १९३ नमुने तपासले असून ३५ नमुने दुषित असल्याचे आढळले. मार्च महिन्यात ग्रामीण भागातील ५३३ नमुने तपासले असता १७६ नमुने दुषित असल्याचे समोर आले. तर शहरी भागातील ११८ नमुने तपासले असून १५ नमुने दुषित असल्याचे आढळले. जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या १५ महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५ हजार १८ नमुने तपासले असून १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले. त्यात ग्रामीण भागातील २ हजार ७७८ नमुने तपासले असून यातील २२३ नमुने दुषित आढळले. शहरी भागातील २२४० नमुने तपासले असून २६२ नमुने दुषित असल्याचे आढळून आले. (तालुका प्रतिनिधी) ग्रामपंचायतींची उदासीनताग्रामीण भागातील सर्वात जास्त पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. गावकऱ्यांकडून घर कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी अशा विविध माध्यमातून कराची वसुली ग्रामपंचायत करीत असते. परंतु ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे पाण्याचे स्त्रोत दुषितच असतात. गावातील सार्वजनिक किंवा खासगी जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. कमी प्रमाणात ब्लिचिंग पावडर खरेदी करून त्यातही पैसे कमविण्याचा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे पाण्याचे दुषित स्त्रोत असतात.दूषित पाण्यामुळे सर्वाधिक आजारग्रामीण भागात सार्वजनिक जलस्त्रोतातून पाण्याचा वापर केला जातो. परंतु ग्रामपंचायतींनी वेळोवेळी या जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे या पाण्यामुळे ग्रामीणांना विविध आजार जडतात. साथी सारखे आजारही पाण्यामुळेच पसरतात. या दुषित पाण्याचा सर्वात मोठा धोका पावसाळ्याच्या दिवसात होत असतो. याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष घालणे गरजेचे आहे.