शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

१५ महिन्यांत आढळले पाण्याचे १०८५ दूषित नमुने

By admin | Updated: April 30, 2017 00:49 IST

जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे.

५०१८ नमुन्यांची तपासणी : ग्रामीण भागातील स्रोत सर्वाधिक दूषितगोंदिया : जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे. या दुषित नमुन्यांसाठी ग्रामपंचायत व नगर परिषद प्रशासन जबाबदार ठरत आहे. जिल्हा प्रयोगशाळेत सन २०१६ मध्ये ग्रामीण भागातील १७७८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५०५ नमुने दुषित असल्याचे लक्षात आले. तर शहरी भागातील १७५४ नमुने तपासण्यात आले असून यातील २०० नमुने दुषित असल्याचे आढळले. सन २०१७ च्या जानेवारी महिन्यात ग्रामीण भागातील १६८ नमुने तपासले असून त्यातील ४८ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील१७५ नमुने तपासले असून १२ नमुने दुषित असल्याचे आढळले. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागातील २८९ नमुने तपासले असून त्यातील ९४ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील १९३ नमुने तपासले असून ३५ नमुने दुषित असल्याचे आढळले. मार्च महिन्यात ग्रामीण भागातील ५३३ नमुने तपासले असता १७६ नमुने दुषित असल्याचे समोर आले. तर शहरी भागातील ११८ नमुने तपासले असून १५ नमुने दुषित असल्याचे आढळले. जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या १५ महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५ हजार १८ नमुने तपासले असून १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले. त्यात ग्रामीण भागातील २ हजार ७७८ नमुने तपासले असून यातील २२३ नमुने दुषित आढळले. शहरी भागातील २२४० नमुने तपासले असून २६२ नमुने दुषित असल्याचे आढळून आले. (तालुका प्रतिनिधी) ग्रामपंचायतींची उदासीनताग्रामीण भागातील सर्वात जास्त पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. गावकऱ्यांकडून घर कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी अशा विविध माध्यमातून कराची वसुली ग्रामपंचायत करीत असते. परंतु ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे पाण्याचे स्त्रोत दुषितच असतात. गावातील सार्वजनिक किंवा खासगी जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. कमी प्रमाणात ब्लिचिंग पावडर खरेदी करून त्यातही पैसे कमविण्याचा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे पाण्याचे दुषित स्त्रोत असतात.दूषित पाण्यामुळे सर्वाधिक आजारग्रामीण भागात सार्वजनिक जलस्त्रोतातून पाण्याचा वापर केला जातो. परंतु ग्रामपंचायतींनी वेळोवेळी या जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे या पाण्यामुळे ग्रामीणांना विविध आजार जडतात. साथी सारखे आजारही पाण्यामुळेच पसरतात. या दुषित पाण्याचा सर्वात मोठा धोका पावसाळ्याच्या दिवसात होत असतो. याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष घालणे गरजेचे आहे.