शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

१५ महिन्यांत आढळले पाण्याचे १०८५ दूषित नमुने

By admin | Updated: April 30, 2017 00:49 IST

जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे.

५०१८ नमुन्यांची तपासणी : ग्रामीण भागातील स्रोत सर्वाधिक दूषितगोंदिया : जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे. या दुषित नमुन्यांसाठी ग्रामपंचायत व नगर परिषद प्रशासन जबाबदार ठरत आहे. जिल्हा प्रयोगशाळेत सन २०१६ मध्ये ग्रामीण भागातील १७७८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५०५ नमुने दुषित असल्याचे लक्षात आले. तर शहरी भागातील १७५४ नमुने तपासण्यात आले असून यातील २०० नमुने दुषित असल्याचे आढळले. सन २०१७ च्या जानेवारी महिन्यात ग्रामीण भागातील १६८ नमुने तपासले असून त्यातील ४८ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील१७५ नमुने तपासले असून १२ नमुने दुषित असल्याचे आढळले. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागातील २८९ नमुने तपासले असून त्यातील ९४ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील १९३ नमुने तपासले असून ३५ नमुने दुषित असल्याचे आढळले. मार्च महिन्यात ग्रामीण भागातील ५३३ नमुने तपासले असता १७६ नमुने दुषित असल्याचे समोर आले. तर शहरी भागातील ११८ नमुने तपासले असून १५ नमुने दुषित असल्याचे आढळले. जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या १५ महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५ हजार १८ नमुने तपासले असून १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले. त्यात ग्रामीण भागातील २ हजार ७७८ नमुने तपासले असून यातील २२३ नमुने दुषित आढळले. शहरी भागातील २२४० नमुने तपासले असून २६२ नमुने दुषित असल्याचे आढळून आले. (तालुका प्रतिनिधी) ग्रामपंचायतींची उदासीनताग्रामीण भागातील सर्वात जास्त पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. गावकऱ्यांकडून घर कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी अशा विविध माध्यमातून कराची वसुली ग्रामपंचायत करीत असते. परंतु ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे पाण्याचे स्त्रोत दुषितच असतात. गावातील सार्वजनिक किंवा खासगी जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. कमी प्रमाणात ब्लिचिंग पावडर खरेदी करून त्यातही पैसे कमविण्याचा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे पाण्याचे दुषित स्त्रोत असतात.दूषित पाण्यामुळे सर्वाधिक आजारग्रामीण भागात सार्वजनिक जलस्त्रोतातून पाण्याचा वापर केला जातो. परंतु ग्रामपंचायतींनी वेळोवेळी या जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे या पाण्यामुळे ग्रामीणांना विविध आजार जडतात. साथी सारखे आजारही पाण्यामुळेच पसरतात. या दुषित पाण्याचा सर्वात मोठा धोका पावसाळ्याच्या दिवसात होत असतो. याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष घालणे गरजेचे आहे.