शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

१०९ शाळांना पाणी गळतीचा फटका

By admin | Updated: July 21, 2015 01:13 IST

शिक्षणाचे बाळकडू पाजणाऱ्या आणि उद्याचे नागरिक घडविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची गोरेगाव तालुक्यात वाताहत

दिलीप चव्हाण ल्ल गोरेगावशिक्षणाचे बाळकडू पाजणाऱ्या आणि उद्याचे नागरिक घडविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची गोरेगाव तालुक्यात वाताहत होत आहे. ज्यांचे भविष्य उज्वल करायचे त्या विद्यार्थ्यांचे वर्तमानच इथे बिघडले आहे. त्यांना शाळेत बसवायचे कसे? असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.तालुक्यातील १०९ शाळा पावसाळ्यात गळत असून स्लॅबमधून अविरत पाणी झिरपते. विद्यार्थी ओल्या जागेवर बसून ज्ञानार्जन करतात. हा सर्व प्रकार केविलवाणा असून कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.तालुक्यात खासगी अनुदानित शाळांचे एकछत्री वर्चस्व आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत सोर्इंच्या नावावर प्रलोभन देवून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यात येते. मात्र येथील इमारती पडक्या अवस्थेत आहेत. काही इमारती मोठ्या प्रमाणावर जर्जर झाल्याचे चित्र आहे. अनेक शाळांमध्ये कौलारू इमारतीत बसून विद्यार्थी पावसाचे तुषार अंगाव झेलतात तर काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कमी जागेवर दाटीवाटीने बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानित शाळांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाचे लक्ष नाही. खासगी शाळा अनुदानापलिकडे शाळांच्या मुलभूत सोयींकडे विशेष लक्ष देत नाहीत. शाळा परिक्षणापुरत्या शाळा अद्यावत करुन शासनाची दिशाभूल करण्यात येते. शाळेच्या आवारात साचलेले पाणी व पाण्याचे चिखलात झालेले रुपांतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ ठरत आहे. मात्र याकडे पालक किंवा शिक्षक कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शिक्षणावर शासन कोट्यवधीचा खर्च करीत असताना जिल्हा शिक्षण विभाग मात्र याबाबत किती गंभीर आहे याचा प्रत्यय शाळेची दुरवस्था पाहून आल्याशिवाय राहात नाही. १ ते ४ वर्ग असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी पाणी गळतीमुळे एकाच वर्गात बसून ज्ञानार्जन करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय यावर्षी दूर होईल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.पाऊस आणि सुटीपावसाळ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली तर शालेय प्रशासनाकडे विद्यार्थ्यांना सुटी देण्यापलिकडे पर्याय नसतो. विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे हा प्रश्न शिक्षण विभागाला पावसाळ्यात सतावत राहतो. पुढे पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी द्यावी लागते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. जर्जर शाळा, लक्ष कोणाचे ?तालुक्यात शासकीय व खासगी शाळांचा तोरा मोठा आहे. जिल्हा परिषद शाळा असो किंवा खासगी शाळा, शाळेत प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी व पालकांना सोई-सुविधेसाठी दिले जाणारे आमिष किती पाळले जाते, हा संशोधनाचा विषय आहे.