शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१०९ शाळांना पाणी गळतीचा फटका

By admin | Updated: July 21, 2015 01:13 IST

शिक्षणाचे बाळकडू पाजणाऱ्या आणि उद्याचे नागरिक घडविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची गोरेगाव तालुक्यात वाताहत

दिलीप चव्हाण ल्ल गोरेगावशिक्षणाचे बाळकडू पाजणाऱ्या आणि उद्याचे नागरिक घडविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची गोरेगाव तालुक्यात वाताहत होत आहे. ज्यांचे भविष्य उज्वल करायचे त्या विद्यार्थ्यांचे वर्तमानच इथे बिघडले आहे. त्यांना शाळेत बसवायचे कसे? असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.तालुक्यातील १०९ शाळा पावसाळ्यात गळत असून स्लॅबमधून अविरत पाणी झिरपते. विद्यार्थी ओल्या जागेवर बसून ज्ञानार्जन करतात. हा सर्व प्रकार केविलवाणा असून कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.तालुक्यात खासगी अनुदानित शाळांचे एकछत्री वर्चस्व आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत सोर्इंच्या नावावर प्रलोभन देवून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यात येते. मात्र येथील इमारती पडक्या अवस्थेत आहेत. काही इमारती मोठ्या प्रमाणावर जर्जर झाल्याचे चित्र आहे. अनेक शाळांमध्ये कौलारू इमारतीत बसून विद्यार्थी पावसाचे तुषार अंगाव झेलतात तर काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कमी जागेवर दाटीवाटीने बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानित शाळांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाचे लक्ष नाही. खासगी शाळा अनुदानापलिकडे शाळांच्या मुलभूत सोयींकडे विशेष लक्ष देत नाहीत. शाळा परिक्षणापुरत्या शाळा अद्यावत करुन शासनाची दिशाभूल करण्यात येते. शाळेच्या आवारात साचलेले पाणी व पाण्याचे चिखलात झालेले रुपांतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ ठरत आहे. मात्र याकडे पालक किंवा शिक्षक कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शिक्षणावर शासन कोट्यवधीचा खर्च करीत असताना जिल्हा शिक्षण विभाग मात्र याबाबत किती गंभीर आहे याचा प्रत्यय शाळेची दुरवस्था पाहून आल्याशिवाय राहात नाही. १ ते ४ वर्ग असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी पाणी गळतीमुळे एकाच वर्गात बसून ज्ञानार्जन करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय यावर्षी दूर होईल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.पाऊस आणि सुटीपावसाळ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली तर शालेय प्रशासनाकडे विद्यार्थ्यांना सुटी देण्यापलिकडे पर्याय नसतो. विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे हा प्रश्न शिक्षण विभागाला पावसाळ्यात सतावत राहतो. पुढे पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी द्यावी लागते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. जर्जर शाळा, लक्ष कोणाचे ?तालुक्यात शासकीय व खासगी शाळांचा तोरा मोठा आहे. जिल्हा परिषद शाळा असो किंवा खासगी शाळा, शाळेत प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी व पालकांना सोई-सुविधेसाठी दिले जाणारे आमिष किती पाळले जाते, हा संशोधनाचा विषय आहे.