शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

आदेश टाइप करायलाही कर्मचारी नाही

By admin | Updated: May 27, 2014 01:36 IST

पणजी : मुख्य माहिती आयुक्त म्हणून लीना मेहेंदळे यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन आता सात महिन्यांचा काळ लोटला; पण सरकारच्या प्रशासकीय पातळीवरून त्यांना हवे

पणजी : मुख्य माहिती आयुक्त म्हणून लीना मेहेंदळे यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन आता सात महिन्यांचा काळ लोटला; पण सरकारच्या प्रशासकीय पातळीवरून त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नसल्याने अजूनही आयुक्तालयाला अनेक मूलभूत अडचणींचा व समस्यांचा सामना करावा लागत आहे. अजूनही पाटो येथील केवळ ८० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत मेहेंदळे यांचे कार्यालय चालते. हे कार्यालय यापुढे ३०० चौरस मीटर जागेत हलविले जाणार आहे. ती जागा अजून पूर्णत: तयार झालेली नाही. गेल्या वर्षी २३ आॅक्टोबर रोजी मेहेंदळे यांनी पदभार स्वीकारला होता, तेव्हा त्यांना सरकारकडून अनेक आश्वासने देण्यात आली होती; पण त्यापैकी बरीच आश्वासने ढिम्म प्रशासनामुळे मूर्त स्वरूपात आलेली नाहीत. मेहेंदळे यांच्या दिमतीला पुरेसे मनुष्यबळ नाही. अनेकदा जास्त महिला कर्मचार्‍यांनाच त्यांच्या कार्यालयात काम करण्यासाठी पाठवले जाते. या कर्मचारी वारंवार रजेवर जातात. मेहेंदळे यांनी एखाद्या प्रकरणी आदेश दिल्यानंतर तो आदेश टाइप करण्यासाठी कर्मचारी नाही. त्या आदेशाचा कोकणी-मराठीत अनुवाद करण्यासाठी किंवा संकेतस्थळावर तो आदेश उपलब्ध करण्यासाठीही कर्मचारी नाही, अशा प्रकारच्या अडचणींचा सामना अजूनही माहिती आयुक्तालय करत आहे. माहिती आयुक्तालयाच्या अनेक शिफारशींची प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही. सरकारी खात्यांच्या संकेतस्थळावर सुमोटो पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी म्हणून माहिती हक्क कायद्यातील कलम चारची अंमलबजावणी केली जावी, अशी माहिती आयुक्तालयाची शिफारस आहे; पण त्या शिफारशीचे पालन केले जात नाही. सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून ते संगणकीकृत केले जावेत म्हणूनही मेहेंदळे यांनी प्रशासनास पत्रे लिहिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. मेहेंदळे यांनी ताबा घेतला तेव्हा मोठ्या प्रमाणात आव्हान अर्ज प्रलंबित होते. ते निकालात काढण्याचे काम त्या करत आहेत; पण पुरेसे मनुष्यबळ नाही ही डोकेदुखी आहे. आयुक्तालयाची वेबसाइट सक्रिय करून द्यावी ही मेहेंदळे यांची अपेक्षाही शासकीय यंत्रणा पूर्ण करू शकलेली नाही. माहिती हक्क कायद्याबाबत प्रशासन संवेदनशील नाही, अशा प्रकारचा अनुभव मेहेंदळे यांना येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी खात्यांमधील अनेक माहिती अधिकारी लोकांना माहिती देण्याबाबत टाळाटाळ करतात. त्यासाठी ते पळवाटा शोधतात. फाइल हरवली आहे, माहिती उपलब्ध नाही, अशा सबबी सांगितल्या जातात व त्यामुळे अर्जदारांना माहिती आयुक्तालयाकडे जावे लागते. (खास प्रतिनिधी)