शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

हरमल समुद्रकिनार्‍याला वाचवा

By admin | Updated: May 11, 2014 01:00 IST

हरमल समुद्रकिनार्‍याला वाचवा

हरमल : येथील हरमल समुद्रकिनारा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटकांचा येथे राबता असतो. जसे पर्यटकांसाठी कायदे अस्तित्वात आहेत, तसेच कायदे किनारे संरक्षणासाठीही आहेत; परंतु कायद्याच्या अंमलबजावणीमुळे किनार्‍यांचे सौंदर्य लुप्त होत आहे. एकंदर संबंधित खात्याचा कारभार ‘आंधळे दळते अन् कुत्रे पिठ खाते,’ असाच चालत असतो, असा समज बनला आहे. त्यामुळे बकालवस्थेकडे झुकण्यापूर्वी हरमल किनार्‍याचे सौंदर्य टिकविण्यासाठी आणि सुशोभिकरणासाठी पर्यटन व वन खात्याने संयुक्तरीत्या पावले उचलावीत, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. याबाबत येथील नागरिक अभिषेक नाईक म्हणाले की, साधारण हरमलला दीड-दोन किलोमीटरची किनारपट्टी आहे. काही भाग सोडल्यास किनार्‍याला हिरवाईचा साज आहे. सुरूची झाडे, मारवेल, लिंगड व काटेरी झुडपांमुळे किनार्‍याचे सौंदर्य खुलून दिसते. पावसाळ्यात हा परिसर नजरेस सुखावतो. सर्वत्र हिरवाई व किनार्‍याची धूप रोखण्यासाठी पसरलेला मारवेल आढळतो. या विस्तीर्ण किनार्‍यावर ताठ मानेने व ४०-५० वर्षांपासून उभी असलेली सुरूची झाडे पावसाळ्यात कोसळत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अशीच सुरूची झाडे जमीनदोस्त झाली होती. त्या वेळेस वन खात्याच्या अधिकार्‍यांनी येऊन पाहणी केली. मात्र, नेहमीप्रमाणे वन खात्याने या किनार्‍याकडे दुर्लक्ष केले. येथे वृक्षारोपण व अन्य योजना राबविण्याकडे वन खात्याबरोबरच पर्यटन खात्यानेही लक्ष दिले नाही. दरवर्षी पर्यटन हंगामात ९ ते १० शॅक्स या किनार्‍यावर पर्यटन खात्याच्या निर्देशानुसार उभारले जातात. त्या शॅक्सचे वाटप करण्यासाठी पर्यटन खाते व अधिकारी येथे येतात आणि काम झाले की निघून जातात. त्यानंतर शॅक्स उभारणीत सगळा सावळागोंधळच असतो. जर पर्यटन खात्याने शॅक्स वाल्यांना सीमा निश्चित केल्यास पादचार्‍यांना मोकळेपणाने फिरता येणे शक्य असल्याचे मत नागरिक संगम सातोस्करने व्यक्त केले. विशेष म्हणजे काही लोकांनी किनार्‍यावर नारळाची झाडे व भेंडीची झाडे लावून सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)