शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सायबर क्राईमचे प्रमाण वाढले

By admin | Updated: February 2, 2017 00:30 IST

कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे.

सावधानतेचा इशारा : बँकेतून खात्री करुनच व्यवहार करावाब्रह्मपुरी : कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठलीही माहिती मोबाईल वर न देता बँकेत परस्पर जाऊन व्यवहार करण्याचे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.मागील आठ दिवसांमध्ये दोन ते तीन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम फसवा कॉल करुन काढल्या जाण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. निनावी कॉल करुन एटीएम बंद पडल्याचे सांगून सुरु करण्याविषयी आग्रह केला जातो. मी बँकेचाच कर्मचारी बोलत असल्याचे सांगून संपूर्ण माहिती विचारली जाते व काही तासानंतर खात्यामधून शिल्लक रक्कम पूर्णच्या पूर्णच काढली जाण्याचे प्रकार प्रस्तूत प्रतिनिधी व बँक व्यवस्थापनासमोर उघडकीस आले असल्याने पुन्हा ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून व्यवस्थापकांनी ग्राहकांना सावधनतेचा इशारा दिलेला आहे. कोणताही निनावी कॉल आल्यास आपल्या एटीएम संदर्भात माहिती देवू नये व तशा कॉलवर जास्त वेळ न बोलता तो बंद करुन घ्यावा. त्यानंतर ज्या बँकेत आपला खाता असेल, त्या शाखेत जाऊन विचारपूस करावी. बँकेतून फोन आलाच तर लॅडलाईनवरुन येत असल्याने आपल्या शहराचा कोड नंबर आपल्याला ओळखता येतो. त्यावरुन हा फोन बँकेतूनच आला, हे समजण्यास मदत होत असते. बँक कोणत्याही ग्राहकाला शक्यतो फोन करीत नाही व मोबाईलवरुन तर बँकेचा कोणताही कर्मचारी फोन करीतच नाही. त्यामुळे मोबाईलवर आलेल्या निनावी फोनवरुन आपल्या पर्सनल अकाऊंट अथवा एटीएमची माहिती कोणत्याही ग्राहकांनी देऊ नये, असे आवाहन सर्वच बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खातेदारांना केली आहे. सायबर क्राईमचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा क्राईमचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याने काढल्या गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे ग्राहकांनी वाढत्या सायबर क्राईमच्या गुरफट्यात येऊ नये व शंका आल्यास थेट बँकेत संपर्क साधावा, असेही बँक व्यवस्थापन व पोलिसांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)