शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अवकाळी वृष्टीमुळे आरोग्याच्या समस्या शक्य

By admin | Updated: May 12, 2014 00:21 IST

अवकाळी वृष्टीमुळे आरोग्याच्या समस्या शक्य

पणजी : राज्यात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची शक्यता वाढत आहे. मलेरियाच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता असून, घरासभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे भर द्यावा. पूर्व पावसामुळे आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता आहे, असे आरोग्य खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. मलेरियाच्या डासांच्या पैदासीबरोबरच खोकला, थंडी, घसा खवखवणे घसा बसणे इत्यादी आजार वाढू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाचे थंड वातावरण आणि पाऊस पडून गेल्यावर वातावरणात येणार्‍या उष्णतेमुळे अनेक आजारांचा फैलाव होऊ शकतो. नागरिकांनी यासाठी पिण्याचे पाणी उकळून घेण्यापासून ते स्वच्छ गरम अन्नाचे सेवन करण्यासारखी पथ्ये पाळावीत. खोकला, थंडी अशा आजारांतही वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप येणे, डोके दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, असे प्रकार घडू शकतात. राज्यात हल्लीच्या दिवसांत कांजिण्याचे बरेच रुग्ण आढळले होते. अशा वातावरणात कांजिण्यासारखा रोग खूप जलद गतीने पसरण्याची शक्यता असते. सांसर्गिक रोगांचे प्रमाण वाढू लागते. अशा वातावरणात मुलांची जास्त काळजी घ्यावी. फळे, भाज्या इत्यादी स्वच्छ धुवून खाव्यात. हात स्वच्छ धुवूनच खाद्यपदार्थ खावेत. पूर्व पावसाळ्यामुळे होणार्‍या आजारांपासून सुरक्षित राहाण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. कोणताही आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती डॉ. बेतोडकर यांनी दिली. पावसाळ्याच्या हंगामापूर्वीच आलेला हा पाऊस मलेरियाच्या डासांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. नागरिकांनी घरासभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्याचबरोबर नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनीही आपापल्या मतदारक्षेत्रात मलेरियाच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून स्वच्छता राखण्यास हातभार लावावा. पावसाचे पाणी खड्डे, प्लास्टिकच्या बाटल्या, रस्त्यानजीक टाकलेल्या शहाळ्या, टायर, कुळागरात असणार्‍या सुपार्‍यांच्या पोया यात पाणी साचून राहिल्यामुळे मलेरियाच्या डासांना अळी घालण्यास उपयुक्त ठरतात. याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मलेरियाचा फैलाव त्वरेने होऊ शकतो, असे आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. सचिन गोवेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)