शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

आरोंदा जेटीविरोधात आंदोलनाचा निर्धार

By admin | Updated: February 16, 2015 02:14 IST

हरमल : महाराष्ट्रातील आरोंदा या गोव्याच्या सीमेपलीकडील गावात सुरू झालेली व्हाईट आॅर्चिड इस्टेट कंपनीची जेटी स्थानिक

हरमल : महाराष्ट्रातील आरोंदा या गोव्याच्या सीमेपलीकडील गावात सुरू झालेली व्हाईट आॅर्चिड इस्टेट कंपनीची जेटी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता सुरू झाली आहे. त्याविरोधात सर्वशक्तीनिशी आंदोलन करण्याचा निर्धार केरीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. पुढील आठवड्यात सभेचे आयोजन करून आम्ही आमची शक्ती दाखवून देऊ, असा इशारा या वेळी देण्यात आला. या बैठकीत केरीचे सरपंच जयंत केरकर, पेडणे स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र प्रभुदेसाई, अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, पालयेचे सरपंच बाबनी आरोलकर, पंच रुणाली तळकर, उपसरपंच ज्योत्स्ना कासकर, फ्रान्सिस रॉड्रिगीस, रिमा हर्जी, रत्नाकर हर्जी, सचिन परब, फा. पेस्टा, आरोंदा संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरोडकर, आनंद शिरगावकर आदी उपस्थित होते. केरी-तेरेखोल गावातील पारंपरिक मच्छीमार बांधव जेटीवरील बार्ज वाहतुकीमुळे त्रस्त बनलेले आहेत. मासळी विकणे कठीण झाले आहे. ज्यावरून त्यांची उपजीविका व्हायची, तो मार्ग बंद झाल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे फ्रान्सिस रॉड्रिगीस यांनी सांगितले. आरोंदा जेटीविरोधात सर्वांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन केले. देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, की पेडणे स्वाभिमानी संघटना अन्यायाविरोधात नेहमीच लढा देत राहिली आहे. आरोंदा जेटी ही अवघ्याच लोकांच्या स्वार्थापायी व भ्रष्ट लोकांच्या कल्पनेतील प्रकल्प आहे. त्यासाठी आम्ही जरी विविध राजकीय पक्षांचे असलो तरी लोकहिताविरोधातील प्रकल्पासाठी आम्ही मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. जोपर्यंत गावातील नागरिक जागृत होत नाहीत, तोपर्यंत लढा उभा राहत नाही. या लढ्यासाठी एकजुटीने मतभेद बाजूला सारून सरकारच्या निर्णयाविरुद्ध दंड थोपटावे, असे आवाहन प्रभुदेसाई यांनी केले. अ‍ॅड. शहापूरकर म्हणाले, की आरोंदा जेटी प्रकल्प हा मुख्य काही गोष्टी व नियम, अटी यांचे उल्लंघन करून झालेला आहे. पर्यावरणीय दाखला, सीआरझेड व अन्य सरकारी खात्यांना खोटी माहिती देऊन व संकेतस्थळावर अर्धवट माहितीचा हा प्रकल्प सध्या डोईजड बनला आहे. महाराष्ट्र सरकार सागरी पोलीस दल व पिस्तूलधारी पोलिसांना सोबतीस घेत कोळसा बार्ज वाहतूक करीत आहे. याबाबत गोवा सरकारकडून त्या वाहतुकीला कशी परवानगी मिळाली याची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा लढा प्रखरपणे सुरू ठेवावा लागेल. फा. परेरा, सरपंच जयंत केरकर, आनंद शिरगावकर यांचीही भाषणे झाली. हा प्रकल्प नुकसानकारक आहे. लोकप्रतिनिधी व विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकांच्या भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या वेळी समन्वय समिती निवडण्यात आली. त्यात जयंत केरकर, बाबनी आरोलकर, निमंत्रक सचिन परब, रिमा हर्जी, सुरेश नाईक, गजानन नाईक, गंगाराम मठकर, संजय कासकर, शशिकांत पेडणेकर, रवींद्र पेडणेकर, आगुस्तीन डिसोझा, सांतान डायस, लुडविन डिसोझा व अन्य सदस्य आहेत. सूत्रसंचालन व आभार विलास आरोलकर यांनी मानले. सभेस १०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)