शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

आरोंदा जेटीविरोधात आंदोलनाचा निर्धार

By admin | Updated: February 16, 2015 02:14 IST

हरमल : महाराष्ट्रातील आरोंदा या गोव्याच्या सीमेपलीकडील गावात सुरू झालेली व्हाईट आॅर्चिड इस्टेट कंपनीची जेटी स्थानिक

हरमल : महाराष्ट्रातील आरोंदा या गोव्याच्या सीमेपलीकडील गावात सुरू झालेली व्हाईट आॅर्चिड इस्टेट कंपनीची जेटी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता सुरू झाली आहे. त्याविरोधात सर्वशक्तीनिशी आंदोलन करण्याचा निर्धार केरीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. पुढील आठवड्यात सभेचे आयोजन करून आम्ही आमची शक्ती दाखवून देऊ, असा इशारा या वेळी देण्यात आला. या बैठकीत केरीचे सरपंच जयंत केरकर, पेडणे स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र प्रभुदेसाई, अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, पालयेचे सरपंच बाबनी आरोलकर, पंच रुणाली तळकर, उपसरपंच ज्योत्स्ना कासकर, फ्रान्सिस रॉड्रिगीस, रिमा हर्जी, रत्नाकर हर्जी, सचिन परब, फा. पेस्टा, आरोंदा संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरोडकर, आनंद शिरगावकर आदी उपस्थित होते. केरी-तेरेखोल गावातील पारंपरिक मच्छीमार बांधव जेटीवरील बार्ज वाहतुकीमुळे त्रस्त बनलेले आहेत. मासळी विकणे कठीण झाले आहे. ज्यावरून त्यांची उपजीविका व्हायची, तो मार्ग बंद झाल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे फ्रान्सिस रॉड्रिगीस यांनी सांगितले. आरोंदा जेटीविरोधात सर्वांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन केले. देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, की पेडणे स्वाभिमानी संघटना अन्यायाविरोधात नेहमीच लढा देत राहिली आहे. आरोंदा जेटी ही अवघ्याच लोकांच्या स्वार्थापायी व भ्रष्ट लोकांच्या कल्पनेतील प्रकल्प आहे. त्यासाठी आम्ही जरी विविध राजकीय पक्षांचे असलो तरी लोकहिताविरोधातील प्रकल्पासाठी आम्ही मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. जोपर्यंत गावातील नागरिक जागृत होत नाहीत, तोपर्यंत लढा उभा राहत नाही. या लढ्यासाठी एकजुटीने मतभेद बाजूला सारून सरकारच्या निर्णयाविरुद्ध दंड थोपटावे, असे आवाहन प्रभुदेसाई यांनी केले. अ‍ॅड. शहापूरकर म्हणाले, की आरोंदा जेटी प्रकल्प हा मुख्य काही गोष्टी व नियम, अटी यांचे उल्लंघन करून झालेला आहे. पर्यावरणीय दाखला, सीआरझेड व अन्य सरकारी खात्यांना खोटी माहिती देऊन व संकेतस्थळावर अर्धवट माहितीचा हा प्रकल्प सध्या डोईजड बनला आहे. महाराष्ट्र सरकार सागरी पोलीस दल व पिस्तूलधारी पोलिसांना सोबतीस घेत कोळसा बार्ज वाहतूक करीत आहे. याबाबत गोवा सरकारकडून त्या वाहतुकीला कशी परवानगी मिळाली याची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा लढा प्रखरपणे सुरू ठेवावा लागेल. फा. परेरा, सरपंच जयंत केरकर, आनंद शिरगावकर यांचीही भाषणे झाली. हा प्रकल्प नुकसानकारक आहे. लोकप्रतिनिधी व विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकांच्या भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या वेळी समन्वय समिती निवडण्यात आली. त्यात जयंत केरकर, बाबनी आरोलकर, निमंत्रक सचिन परब, रिमा हर्जी, सुरेश नाईक, गजानन नाईक, गंगाराम मठकर, संजय कासकर, शशिकांत पेडणेकर, रवींद्र पेडणेकर, आगुस्तीन डिसोझा, सांतान डायस, लुडविन डिसोझा व अन्य सदस्य आहेत. सूत्रसंचालन व आभार विलास आरोलकर यांनी मानले. सभेस १०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)