शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

माध्यान्ह आहाराच्या चपात्यांवरून वाद

By admin | Updated: October 19, 2015 02:27 IST

पणजी : शिक्षण खात्याने माध्यान्ह आहाराचा मेनू बदलून चपात्यांचा समावेश केल्यानंतर राज्यभरातील स्वयंसाहाय्य गटांमध्ये हा विषय वादाचा बनला आहे.

पणजी : शिक्षण खात्याने माध्यान्ह आहाराचा मेनू बदलून चपात्यांचा समावेश केल्यानंतर राज्यभरातील स्वयंसाहाय्य गटांमध्ये हा विषय वादाचा बनला आहे. रोज हजारो चपात्या करणे आम्हाला शक्य होणार नाही, अशी भूमिका महिलांच्या अनेक स्वयंसाहाय्य गटांनी घेतली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने या वादावर वेगळा विचार सुरू केला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित व अन्य विद्यालयांमध्ये मुलांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राट राज्यातील बहुतांश महिला मंडळे व स्वयंसाहाय्य गटांकडे आहे. रोज विविध प्रकारची भाजी देण्यास स्वयंसाहाय्य गटांचा आक्षेप नाही; पण त्या भाजीसोबत रोज चपात्या देण्याची जी सूचना शिक्षण खात्याने केली आहे, ती महिला मंडळे व महिलांच्या गटांना मान्य नाही. चपात्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे लागेल. केवळ शंभर-दोनशे चपात्या नव्हे, तर रोज एका स्वयंसाहाय्य गटास हजारभर चपात्या कराव्या लागतील. हे काम अतिरिक्त वेळ, शक्ती व पैसा खर्च करायला लावणारे आहे. एवढे करून आम्हाला आर्थिक लाभ काही होणार नाही. उलट आमचे कमिशन अतिरिक्त मनुष्यबळावर खर्च करावे लागेल, असे काही स्वयंसाहाय्य गटांनी सांगितले. राज्यभरातील माध्यान्ह आहार पुरवठ्याशी संबंधित कंत्राटदार महिलांनी शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांचीही भेट घेतली. आपली समस्या त्यांनी संचालकांसमोर मांडली व उपाय काढण्याची विनंती केली. पाव पुरविणे आम्हाला परवडते; पण रोज हजारो चपात्या करून पुरविणे शक्य नाही, असा मुद्दा महिलांनी मांडला. प्रायोगिक तत्त्वावर सध्या तुम्ही चपात्या करून पाहा, असे संचालकांनी महिलांना सुचविले. आम्ही सादर करत असलेली बिलेदेखील आम्हाला वेळेवर मिळत नाहीत. तीन ते चार महिन्यांनी आमची बिले फेडली जातात, असेही कंत्राटदार संस्थांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)