शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

माध्यान्ह आहाराच्या चपात्यांवरून वाद

By admin | Updated: October 19, 2015 02:27 IST

पणजी : शिक्षण खात्याने माध्यान्ह आहाराचा मेनू बदलून चपात्यांचा समावेश केल्यानंतर राज्यभरातील स्वयंसाहाय्य गटांमध्ये हा विषय वादाचा बनला आहे.

पणजी : शिक्षण खात्याने माध्यान्ह आहाराचा मेनू बदलून चपात्यांचा समावेश केल्यानंतर राज्यभरातील स्वयंसाहाय्य गटांमध्ये हा विषय वादाचा बनला आहे. रोज हजारो चपात्या करणे आम्हाला शक्य होणार नाही, अशी भूमिका महिलांच्या अनेक स्वयंसाहाय्य गटांनी घेतली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने या वादावर वेगळा विचार सुरू केला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित व अन्य विद्यालयांमध्ये मुलांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राट राज्यातील बहुतांश महिला मंडळे व स्वयंसाहाय्य गटांकडे आहे. रोज विविध प्रकारची भाजी देण्यास स्वयंसाहाय्य गटांचा आक्षेप नाही; पण त्या भाजीसोबत रोज चपात्या देण्याची जी सूचना शिक्षण खात्याने केली आहे, ती महिला मंडळे व महिलांच्या गटांना मान्य नाही. चपात्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे लागेल. केवळ शंभर-दोनशे चपात्या नव्हे, तर रोज एका स्वयंसाहाय्य गटास हजारभर चपात्या कराव्या लागतील. हे काम अतिरिक्त वेळ, शक्ती व पैसा खर्च करायला लावणारे आहे. एवढे करून आम्हाला आर्थिक लाभ काही होणार नाही. उलट आमचे कमिशन अतिरिक्त मनुष्यबळावर खर्च करावे लागेल, असे काही स्वयंसाहाय्य गटांनी सांगितले. राज्यभरातील माध्यान्ह आहार पुरवठ्याशी संबंधित कंत्राटदार महिलांनी शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांचीही भेट घेतली. आपली समस्या त्यांनी संचालकांसमोर मांडली व उपाय काढण्याची विनंती केली. पाव पुरविणे आम्हाला परवडते; पण रोज हजारो चपात्या करून पुरविणे शक्य नाही, असा मुद्दा महिलांनी मांडला. प्रायोगिक तत्त्वावर सध्या तुम्ही चपात्या करून पाहा, असे संचालकांनी महिलांना सुचविले. आम्ही सादर करत असलेली बिलेदेखील आम्हाला वेळेवर मिळत नाहीत. तीन ते चार महिन्यांनी आमची बिले फेडली जातात, असेही कंत्राटदार संस्थांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)