शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तिसवाडीत बाबूश हरले आणि जिंकलेही...

By admin | Updated: March 12, 2017 02:26 IST

पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे;

पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे; पण तिसवाडीतील अन्य मतदारसंघांमध्ये बाबूश फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. बाबूशचे तीन उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर यांच्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आता प्रथमच भाजपचा विजय झाला.सांताक्रुझ मतदारसंघात बाबूशने टोनी फर्नांडिस यांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. टोनी हे कमकुवत उमेदवार होते; पण काँग्रेसच्या तिकिटामुळे टोनी विजयी झाले. बाबूश हे सांताक्रुझचे माजी आमदार आहेत. आपण बाबूशसोबत आहोत, असे विधान मतमोजणी पूर्ण होताच लगेच टोनी फर्नांडिस यांनी केले. बाबूशच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांचा ताळगावमध्ये प्रभाव नव्हता. जेनिफर पराभूत होतात, अशी चर्चा मतदानानंतरही सुरू होती. मात्र, बाबूश यांचा स्वत:चा ताळगाव मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भाजपचे दत्तप्रसाद नाईक यांचा ताळगावमध्ये पराभव झाला. जर ताळगावमध्येही बाबूशच्या पत्नीचा पराभव झाला असता तर मोन्सेरात यांच्यासाठी तो फारच मोठा धक्का बसला असता. सांतआंद्रे मतदारसंघात फ्रान्सिस सिल्वेरा हे विजयी झाले. मोन्सेरात यांनी सांतआंद्रेमध्ये सिल्वेरा यांनाच तिकीट द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडे केली होती. बाबूशचे काँग्रेससोबत जमले नाही तर काँग्रेसचे तिकीट घेणार नाही, असे सिल्वेरा हे प्रारंभी लुईझिन फालेरो यांना सांगत होते. ताळगाव, सांताक्रुझ व सांतआंद्रे हे तीन मतदारसंघ काँग्रेसमधील बाबूश समर्थकांनी जिंकले. सांताक्रुझ हा मतदारसंघ बाबूशसाठी बोनस ठरला. तिथे भाजपनेही बऱ्यापैकी मते प्राप्त केली. पणजीत बाबूश मोन्सेरात स्वत:चा विजय घडवून आणू शकले नाहीत. आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी बाबूशला पराभवाचे पाणी पाजले. १९९४ सालापासून तिसवाडीतील पणजी हा मतदारसंघ अखंडितपणे कायम भाजपसोबत राहिला आहे. तिसवाडीतील पाचपैकी तीन मतदारसंघ आज काँग्रेसकडे आहेत तर दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. २०१२ सालच्या निवडणुकीतही तिसवाडीतील पणजी व सांतआंद्रे हे दोन मतदारसंघ भाजपकडे गेले होते. या वेळी भाजपकडे पणजी व कुंभारजुवे गेले. सांतआंद्रेत मात्र या वेळी भाजपचा प्रभाव पडला नाही. (प्रतिनिधी)