शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

गोवा विद्यापीठाविषयी नाराजी

By admin | Updated: March 30, 2015 01:26 IST

पणजी : गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला

पणजी : गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून पाठिंबा मिळत आहे. विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये घडणाऱ्या घटना आणि विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष यावर समाजातील विविध मान्यवरांनी नाराजीही व्यक्त केली. गोवा विद्यापीठाच्या उपाहारगृह कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी जमिनीवर बसून भोजन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या विद्यापीठाच्या कॅण्टिन आणि सभोवताली परिसरात असलेली अस्वच्छता आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टींच्या विरोधात डॉ. कामत यांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. विद्यापीठाच्या प्राध्यापकांवर अशी जमिनीवर बसून भोजन करण्याची वेळ येणे आणि विद्यापीठ प्रशासनाने याविषयी कोणतीही दखल न घेणे ही घटना चीड आणणारी आहे, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील लोक व्यक्त करत आहेत. कॅण्टिनमध्ये चाललेल्या गैरव्यवहार आणि अनारोग्य व्यवस्थेविषयी डॉ. कामत यांनी कॅण्टिनच्या कंत्राटदाराला प्रश्न केला असता कंत्राटदाराने त्यांच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहिले. विद्यापीठ प्रशासनाने या समस्येकडे लक्ष पुरविण्याऐवजी कंत्राटदाराच्या पत्राची दखल घेत उलट डॉ. कामत यांनाच जाब विचारला. विद्यापीठाने घेतलेल्या या पवित्र्यामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. विद्यापीठाच्या कॅ ण्टिनमध्ये चाललेला प्रकार थांबविण्याऐवजी विद्यापीठ अशा प्रकारांना दुजोरा देत असल्यामुळे या समस्येकडे गंभीर प्रकारे पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. डॉ. कामत यांची मागणी आहे की, कंत्राटदाराने सादर केलेले बदनामीकारक पत्र मागे घेऊन लेखी माफी मागितली पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन कंत्राटदार नेमून सध्या असलेल्या कंत्राटदाराला काढून टाकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॅण्टिनमध्ये अन्नपदार्थांचा दर्जा राखणे, साफसफाई करणे, किमतीप्रमाणे जेवण मिळणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. साहित्यिक दिलीप बोरकर यांनी सांगितले की, गोवा विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये पाहिल्यास अस्वच्छता दृष्टीस पडते. डॉ. नंदकुमार कामत यांनी याविषयी आवाज उठवून अगदी योग्य केले आहे. कॅण्टिनच्या कारभारात भ्रष्टाचार असल्याने याविषयी कोणी ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे डॉ. कामत यांची लढाई योग्य आहे आणि प्रत्येकाने त्यांना साथ दिली पाहिजे.गोवा विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर युगांक नाईक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या प्राध्यापकाने एका चांगल्या कारणासाठी आंदोलन सुरू केले आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. कॅण्टिनमध्ये अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांचा दर्जा योग्य नसल्याने याची दखल घेणे आवश्यक आहे. त्यांच्या या आंदोलनाचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होणार आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहाणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)