शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

३६१ जीवरक्षकांना अटक, सुटका

By admin | Updated: December 31, 2015 02:24 IST

पणजी : येथील बंदर कप्तान जेटीजवळ धरणे धरून बसलेल्या ३६१ संपकरी जीवरक्षकांना पोलिसांनी अटक करून आझाद

पणजी : येथील बंदर कप्तान जेटीजवळ धरणे धरून बसलेल्या ३६१ संपकरी जीवरक्षकांना पोलिसांनी अटक करून आझाद मैदानावर आणल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. ‘एस्मा’ झुगारून आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार जीवरक्षकांनी केला आहे. दुपारी ११.३0 वाजण्याच्या सुमारास मामलेदार, पोलीस उपाधीक्षक सेराफिन डायस व निरीक्षक सिद्धांत शिरोडकर पोलीस फौजफाटा घेऊन जेटीजवळ आले आणि आंदोलकांना तेथून जाण्यास सांगितले; परंतु कोणीही न ऐकल्याने अखेर अटक करण्यात आली. या सर्वांना चालतच आझाद मैदानावर आणण्यात आले. तेथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवून नंतर त्यांना उपविभागीय न्यायदंडा-धिकाऱ्यांसमोर हजर करून सोडण्यात आले. आंदोलकांचे नेतृत्व करणारे आयटकचे सचिव सुहास नाईक यांनी या घटनेचा निषेध करताना सरकारची बुद्धी भ्रष्ट झाल्याचा आरोप केला. जीवरक्षकांच्या मागण्यांबाबत वर्षभरापूर्वी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आणि मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्या सहीने झालेला करार झाला होता तो पाळा, असे आवाहन केले. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मज्जाव असताना हा आदेश धुडकावण्यात आला. त्यामुळे भादंसंच्या कलम १५१ खाली या सर्वांना अटक करण्यात आली व सायंकाळी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या आंदोलनाला सरकारी कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे गजानन नाईक, वीज कर्मचारी संघटनेचे राजू मंगेशकर, सरकारी कर्मचारी संघाचे गणेश चोडणकर, सातुर्मिनो मिस्किता यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिल्याचे नाईक यांनी सांगितले. सेवेत कायम करणे, महिना २१ हजार रुपये पगार तसेच ज्या १७ जीवरक्षकांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घेणे आदी मागण्या आहेत. सरकार व कंपनीने हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संप चालूच राहील, असे ‘आयटक’चे प्रदेश सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. (प्रतिनिधी)