शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

‘कट प्रॅक्टीस’ हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग! - तात्याराव लहाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:41 IST

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी ...

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी टीका ज्येष्ठ नेत्रविकारतज्ज्ञ आणि मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केली.इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. डॉ. लहाने यांनी अध्यक्षीय भाषणात अन्यही अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.कट प्रॅक्टीस म्हणजे एखाद्या डॉक्टराने रुग्णाला उपचारांसाठी दुसºया डॉक्टराकडे पाठविण्यासाठी कमिशन स्वरुपात पैसे घेणे. गरज नसताना महागड्या चाचण्या सांगून लॅबकडून कमिशन घेणे. या कट प्रॅक्टीसमुळे देशातला सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. यासंबंधी शासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कारवाईचे विशेष अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी या वेळी दिली.रुग्ण मरावा, असे डॉक्टरला कधीच वाटत नसते. तो रुग्णाला वाचविण्यासाठीच धडपडत असतो. पण तो देव नव्हे. काही प्रकरणांत प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही संयम ठेवायला हवा, असे आवाहनही डॉ. लहाने यांनी या वेळी केले.लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे. तसेच अतिविशेषोपचार विभागांची संख्या वाढविणेही आवश्यक आहे. तसेच देशातील १०४ दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी भागात राहात असून त्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.त्याचप्रमाणे, ‘भारतामध्ये अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबतच्या अंधश्रद्धा, विविध गैरसमज दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. मृत्यूनंतर एक देह ७ जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. राज्यात २०१५-१६ साली ४१ जणांनी अवयवदान केले होते. यंदा शासनाच्या महाअवयवदान अभियानानंतर हा आकडा १४१ गेला आहे. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनुसार, वैद्यकीय क्षेत्राचा आवाका अनंत आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हानेही मोठी आहेत,’ असेही लहाने यांनी म्हटले.आरोग्य सांभाळण्याची जबाबदारीवैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हाने समर्थपणे पेलण्याचे आमचे ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही साध्य करू, अशी आम्हाला आशा आहे. सर्वांचे ‘आरोग्य’ अधिकाधिक उत्तम करण्यासाठी आम्ही डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतो; परंतु वैयक्तिक पातळीवर आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे, असेही लहाने यावेळी म्हणाले.