शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनांची कामे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:37 IST

गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती.

ठळक मुद्दे१५ गावांना सिंचनाची प्रतीक्षा : निधी असूनही अधिकाºयांअभावी रखडले होते काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती. पण आता विविध कामे मार्गी लागली आहेत. या दोन्ही उपसा सिंचन योजनांमधून दोन्ही तालुक्यात १५ गावांना साडेपाच हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन होणार आहे.७८ टक्के वनक्षेत्राने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे मध्यम प्रकारातील उपसा सिंचन योजना आणि लघुसिंचन प्रकल्पातून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी १० वर्षांपूर्वी दोन उपसा सिंचन योजना आणि कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.वैनगंगा नदीच्या तिरावर कोटगल गावाजवळ उभारल्या जात असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला ३० एप्रिल २००८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेतून गडचिरोली तालुक्यातील कोटगल, नवेगाव, मुरखळा, पारडीकुपी, कन्हेरी, पूलखल, मुडझा बुज., मुडझा व इंदाळा या ९ गावातील ३००० हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार आहे. ४०.३० कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत २६.३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेच्या पंपगृह व उर्ध्वनलिकेच्या बांधकामासाठी ५.९८ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. त्यापैकी ५.०२ हेक्टर खासगी जमीन सरळ खरेदीने संपादित करण्यात आली तर उर्वरित ०.९५ हेक्टर जमीन सरळ खरेदीने संपादन करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.येंगलखेडा प्रकल्पाचे काम पूर्ण, कालवे प्रगतीपथावरकुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा गावाजवळ स्थानिक नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या येंगलखेडा लघु पाटबंधारे प्रकल्पातून येंगलखेडा, चिचेवाडा, सावरगाव व नेहारपल्ली या ४ गावआंना सिंचनाला लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम १०० टक्के झाले असले तरी कालव्यांची कामे व्हायची आहेत. उजवा व डाव्या कालव्याच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. डाव्या कालव्यासाठी वृक्षतोड करावी लागत आहे. या प्रकल्पात २०१४ मध्ये पाण्याचा साठा करण्यात आला आहे. भूसंपादनास जमीनधारकांनी केलेल्या विरोधामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. याशिवाय नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे काम करण्यास अडचणी येत आहेत. या प्रकल्पाकरिता अंदाजे ३३.८४ हेक्टर खासगी जमीनीची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता नलिकसा व दल्ली येथील २२.२२ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली. उर्वरित ११.६२ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी झाली असून येंगलखेडा येथील ३.२० हेक्टर खासगी जमीन सरळ खरेदीकरिता प्रस्तावित आहे. त्यासाठी दर निर्धारण प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. उर्वरित ८.४२ हेक्टर जमिनीचे दर निर्धारण प्रस्ताव तयार करणे सुरू आहे.२०१९-२० अखेर सिंचनाला सुरूवातकोटगल योजनेसाठी २०१७-१८ मध्ये ७ कोटींची कामे तर २०१८-१९ मध्ये १० कोटींची कामे पूर्ण करून २०१९ मध्ये प्रत्यक्ष सिंचनाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच डोंगरगाव-ठाणेगाव योजनेसाठी २०१७-१८ मध्ये ३ कोटी, २०१८-१९ मध्ये ४ कोटी खर्चातून १००० हेक्टर तर २०१९-२० मध्ये ३ कोटी खर्चातून कामे पूर्ण करून २९५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुरूवात करण्याचे नियोजन गडचिरोली पाटबंधारे विभागाने केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पंपगृहांचे काम प्रगतीपथावरकोटगल उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेचे २१०० मीटर लांबीचे पाईप टाकण्याचे काम झालेले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. स्वीच यार्डमध्ये माती भरण्याचे काम चालू आहे. बंद नलिका वितरण प्रणालीचे अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे.डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंपगृहाचे बांधकाम ४० टक्के पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेच्या भूसंपादनाअभावी पाईप बसविण्याचे काम प्रलंबित आहे. जून २०१९ अखेर ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.