शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नक्षलग्रस्त भागातील तलाठी अडचणीत

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्या महसूल विभागाची धुरा सांभाळणारे महत्वाचे शिलेदार असलेले तलाठी विविध अडचणींचा सामना करीत शासकीय कर्तव्य पार पाडत आहे.

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्या महसूल विभागाची धुरा सांभाळणारे महत्वाचे शिलेदार असलेले तलाठी विविध अडचणींचा सामना करीत शासकीय कर्तव्य पार पाडत आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.गडचिरोली जिल्ह्यात तलाठ्याची ३२ पद रिक्त आहेत. या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु पेसा कायद्यामुळे भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत तलाठ्यांवर अतिरिक्त कामाचा प्रचंड बोजा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नवीन तीन उपविभागीय कार्यालयाची निर्मिती झाल्यानंतर तलाठ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले नाही. तसेच शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी करताना तलाठ्याकडून उत्पन्नाचे दाखले मागितले जातात. २१ डिसेंबर २०१२ ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांना उत्पन्नाचे मार्गदर्शक तत्त्व मिळण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांनी अजूनपर्यंत उत्पन्नाचे मार्गदर्शक तत्त्व तलाठ्यांना दिलेले नाही. मागील तीन वर्षांपासून तलाठ्यांची प्रवास भत्ता देयक व बदली प्रवास भत्ता देयक विविध आस्थापनांमध्ये प्रलंबित आहे. मागील दोन वर्षांपासून तलाठ्याच्या कार्यालयाचे घरभाडेही थकीत आहे. २४ वर्षावर सेवा केलेल्या सेवानिवृत्त तलाठ्यांना दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला नाही. जून २०१४ मध्ये स्थानांतर करण्यात आलेल्या तलाठ्यांना भारमुक्त करण्यात आलेले नाही. तसेच मागील काही वर्षांपासून तलाठ्यांना गैरमहसूली कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. महसूली कामाकडे दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांचे काम सुद्धा तलाठी वेळेवर करून देऊ शकत नाही. (प्रतिनिधी)