शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

एसआरपीएफ बटालियनमुळे रोजगार व व्यवसायाला मिळू शकताे वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST

देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असल्याने लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. कपडा, किराणा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स ...

देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असल्याने लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. कपडा, किराणा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स व इतरही साहित्याची मोठी व्यापारपेठ म्हणून शहर प्रसिद्ध आहे. लगतच्या कोरची, कुरखेडा, आरमोरी लाखांदूर, अर्जुनी/मोरगाव या तालुक्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचा मोठा ओघ असताे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलीस दलात वर्तमान स्थितीत ४०० ते ५०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसह किमान २ ते ३ हजार कर्मचारी-अधिकारी वास्तव्यास आहेत. भविष्यात ८०० ते ९०० निवासस्थाने प्रस्तावित असून, किमान तेवढेच पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मिळून किमान ४ ते ५ हजार पोलीस कर्मचारी वास्तव्यास राहण्याची शक्यता आहे.

गरजेनुसार जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी होणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना जोडधंदा करून आर्थिक उन्नती साधण्यास बराच वाव आहे. भाैतिक वस्तुंच्या सुविधेसह कृषी उत्पादनांची माेठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. स्थानिकांना विविध उद्योग उभारून आत्मनिर्भर होण्यास बरीच मदत होणार आहे.