शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शिवराजपुरात स्वयंचलित यंत्राणे केली धानाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST

देसाईगंज तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. ...

देसाईगंज तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. यातील ६० टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भात रोवणीची कामे पाऊस आल्यानंतर एकच वेळी सुरुवात होतात. अशावेळी रोवणीच्या कामासाठी मजुरांची टंचाई निर्माण हाेते. सर्वांची रोवणी एकाच वेळेस होणे अशक्यप्राय बाब आहे. पावसातील खंड व मजुरांची टंचाई यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हे ३० ते ५० दिवसांपर्यंत रोपवाटिकेतच असतात. वास्तविक अधिक उत्पादन वाढीसाठी २० ते २५ दिवसांचे रोपे रोवणे आवश्यक असते. यामध्ये जसजसा कालावधी वाढत जाईल. तसतसा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असते.

नियंत्रित अंतरावर भात लागवड करण्यासाठी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राने भाताची पेरणी करण्याचा सल्ला त्यांना कृषी सहायक योगेश बोरकर यांनी दिला. केवळ आठ किलो बियाणांत आपले एक एकर क्षेत्र त्यांनी पेरणी करून दाखविले. सोबतच खात सुद्धा यंत्राद्वारे दिले. त्यामुळे प्रभावित होऊन शिवराजपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. पेर पद्धतीने पेरणी केलेली जमीन ही ८-१० दिवस पाण्याचा ताण सहज सहन करू शकते. त्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या पद्धतीमधील तांत्रिक बाबी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम व मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम यांनी समजवून दिल्या. यावेळी कृषी सहायक योगेश बोरकर, सुधाकर कोहळे उपस्थित हाेते.

===Photopath===

200621\img-20210620-wa0001.jpg

===Caption===

शिवराजपुर येथून कृषी संजीवनी मोहिमेला सुरवात