शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

खर्रा व तंबाखू घोटाई जोरात

By admin | Updated: May 13, 2015 01:12 IST

वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे.

गडचिरोली : वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. मध्यंतरीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाचे सचिव असताना महेश झगडे यांनी गडचिरोलीत येऊन सक्त कारवाई करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले होते. मात्र आता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात राजरोसपणे दररोज सव्वा कोटी रूपयांचा खर्रा विकल्या जात आहे. या खर्ऱ्याचे ग्राहक शाळकरी मुले व महिला व तरूण असल्याने कर्करोगाच्या आजाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पोलीस व अन्न औषध प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते व विकली जाते. त्याच धर्तीवर तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात तस्करी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासनही या संदर्भात कुठलीही कारवाई करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरापूर्वी गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र गडचिरोलीत कुठेही ही बंदी असल्याचे दिसून येत नाही. छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून जिल्ह्याचे अनेक तालुके आहेत. छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव, पाखांजूर, धानोरा मार्ग गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी केली जात आहे. महाराष्ट्रात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नसतांना या मालाचे होलसेल विक्रेते होतेच. शासनाने बंदी घातल्यावरही याच विक्रेत्यांमार्फत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा माल राजरोसपणे पोहचविला जात आहे. ठराविक दुकानदार गडचिरोली शहरात अशा मंडळींकडे मालासाठी येरझाऱ्या घालत असल्याचे चित्र आहे.छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात कुठेही सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नाही. तेथून कोरची, धानोरा, कुरखेडा आदी भागात माल पाठविला जातो व ग्रामीण भागात तो जुन्याच वितरकांमार्फत पुरवठा केला जातो. त्यामुळे शासनाच्या बंदीला अर्थच उरलेला नाही. उलट शासनाने बंदी केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची कमाई जोमाने वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात खपतो सव्वा कोटींचा खर्रागडचिरोली जिल्ह्यात सुगंधी तंबाखु, सुपारी, चुना यांचे मिश्रण करून तयार करण्यात आलेला एक खर्रा साधारणत: १० ते २० रूपयाला विकल्या जातो. एक पानठेला चालक दिवसाला खर्रा बनविण्यासाठी एक किलो सुपारी वापरतो. एक किलो सुपारीच्या माध्यमातून किमान ५० खर्रे तयार केले जातात. एक पानठेला चालक दिवसाला ५०० रूपयाचे खर्रे विकतो. जिल्ह्यात २५ हजार पानठेले चालक असल्याचे पकडले तर दररोजचीही उलाढाल १ कोटी २५ लाख रूपयावर जाते. संपूर्ण जिल्ह्याच्या खर्रा विक्रीचा हा हिशोब कोटीच्या घरात जातो. याचा अर्थ दररोज जिल्ह्यात सव्वा कोटी रूपयाचा खर्रा नागरिक खातात.सारेच अवैध धंदेवाले पुनर्वसनाची करतात गोष्टराज्यात गुटखा बंदीनंतर गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी खर्रा व गुटखा विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पानठेला व्यावसायिकांनी बंद आंदोलन करून मोर्चाही काढला होता. त्यांच्या समर्थनासाठी विविध राजकीय पक्षांची मंडळी पुढे सरसावली होती. आधी पानठेला विक्रेत्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी करीत होते. खर्रा, गुटखा या पदार्थांच्या सेवनामुळे तरूण पिढी, लहान मुले, महिला यांचे जबडे उघडणे कठीण झाले आहे. याची राजकीय पुढाऱ्यांना जाण नाही. जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी हे डॉक्टर पदवी घेतलेले आहे. तरीही ते अशा व्यावसायिकांचे राजरोस समर्थन करतात, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.