शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अंगणवाडी बांधकामाचा सहा कोटींचा निधी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:14 IST

जिल्हाभरात १७५ नवीन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करून त्यामध्ये बालकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने सुमारे पाच कोटी ९० लाख ६२ हजार ५०० रूपयांचा निधी मार्च २०१६ मध्ये उपलब्ध करून दिला होता.

ठळक मुद्दे१७५ इमारतींसाठी निधी : राज्य शासनाच्या हिस्स्याची प्रतीक्षा

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात १७५ नवीन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करून त्यामध्ये बालकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने सुमारे पाच कोटी ९० लाख ६२ हजार ५०० रूपयांचा निधी मार्च २०१६ मध्ये उपलब्ध करून दिला होता. मात्र राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधी दिला नाही. परिणामी केंद्राचा निधी मागील दोन वर्षांपासून पडून आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत देशभरात अंगणवाड्या चालविल्या जातात. मात्र काही अंगणवाड्यांना इमारती नाही. तर काही अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा सुध्दा उपलब्ध नाही. परिणामी अंगणवाडी कर्मचारी आपल्या परीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. अंगणवाडीमध्ये सोयीसुविधा नसल्याने शहरातील अंगणवाड्यांची हालत अतिशय गंभीर झाली आहे. अंगणवाड्यांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. अंगणवाडीमध्ये येणारे विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये जात आहेत.अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास बालकांचा ओढा आणखी वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने १७५ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी ९० लाख ६२ हजार ५०० रूपयांचा निधी ११ मार्च २०१६ रोजी उपलब्ध करून दिला होता. हा केंद्राचा ७५ टक्के निधी असून राज्य शासनाला २५ टक्के म्हणजेच १ कोटी ४७ लाख ६५ हजार ६१५ रूपये उपलब्ध करून द्यायचे होते. केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळून अंगणवाडीचे बांधकाम करायचे होते. मात्र राज्याचा निधी उपलब्ध झाला नाही.परिणामी दोन वर्षांपासून जिल्हास्तरावर केंद्र शासनाचा निधी पडून आहे. मध्यंतरी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाने बºयाच विभागांचा विकास निधी गोठविला होता. राज्यावर कर्जाचे ओझे वाढल्याने २५ टक्के निधी उपलब्ध करून देण्याबाबत असमर्थता दर्शवून केंद्राचा निधी परत करण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. मात्र राज्यभरातील आमदार व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबीला विरोध दर्शविला.केंद्र शासनाचा निधी परत केला तर तो पुन्हा आणताना अडचण निर्माण होईल. ही बाब राज्य शासनाला पटवून दिली. त्यानंतर आता सदर निधी परत न करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र राज्य शासन आपल्या हिस्स्याचा निधी कधी उपलब्ध करून देणार याकडे लक्ष लागले आहे. राज्याचा वाटा मिळाल्यानंतरच काम होणार आहे.प्रीफॅब्रीकेटेड स्ट्रक्चरचे बांधकामया निधीतून प्रीफॅब्रीकेटेड स्ट्रक्चर प्रमाणे प्रत्येक अंगणवाडीचे बांधकाम करायचे आहे. आदिवासी क्षेत्राकरिता खर्चाची मर्यादा ६ लाख ६० हजार रूपये तर इतर क्षेत्राकरिता सहा लाख रूपये ठेवण्यात आली आहे. प्रीफॅब्रीकेटेड स्ट्रक्चरच्या इमारतीमध्ये पुरेशी खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी या अंगणवाडीचे वातावरण योग्य राहते. त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये बालकांना शिक्षण व खेळण्यासाठी शैक्षणिक साधने सुध्दा उपलब्ध करून द्यायची आहेत.१३ जिल्ह्यांना प्राप्त झाला होता निधीकेंद्र शासनाने राज्यातील अहमदनगर, बीड, बुलडाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, सांगली या १३ जिल्ह्यांना एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत सुमारे १२२ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून ३ हजार ६३२ अंगणवाड्यांचे बांधकाम करायचे होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधी करून दिला नाही. परिणामी सदर निधी पडून आहे. केंद्र शासनाने प्रती अंगणवाडी ३ लाख ३७ हजार ५०० रूपये उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित निधी राज्य शासनाला भरायचा आहे.