शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

शिवकालीन बंधारे ठरू शकतात तालुक्यासाठी वरदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:40 IST

देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाऱ्यांवरील अनेक गावांना गाढवी नदीमुळे पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देपाणीटंचाईवर योग्य नियोजन हवे : देसाईगंज तालुक्यात चार ठिकाणी बंधाऱ्यांची गरज

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी/विसोरा : देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना गाढवी नदीमुळे पाणी पुरवठा होतो. परंतु ही नदी हंगामी स्वरूपाची असल्याने आणि मागील काही वर्षापासून पर्जन्यमानात घट झाल्याने नदीचा प्रवाह फेब्रुवारीच्या शेवटी बंद होऊन ती कोरडी पडते. यावर उपाय म्हणून शिवकालीन बंधारे बांधल्यास उन्हाळ्यातही पाणी मिळणे शक्य होणार आहे.देसाईगंज तालुक्यात उत्तर सीमेतून बोळधा या गावाजवळ गाढवी नदी प्रवेश करून तिथून पुढे बोळधा, कोरेगाव, एकलपूर, चोप, विसोरा, शंकरपूर, तुळशी, कोकडी, किन्हाळा-मोहटोला, डोंगरगाव, झरी-फरी, अरततोंडी या किनाºयालगतच्या गावातील शेतजमिनीला पाणी पुरवते. एकुणच देसाईगंज तालुक्यातील कृषी क्षेत्राला जलपुरवठा करून त्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांना जीवन देणारी ही सरीता तालुक्यासाठी वरदान आहे.गाढवी नदीच्या किनाऱ्याजवळच्या गावातील शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत, गावकरी यांच्या श्रमदानातून दरवर्षी वनराई बंधारे बांधतात. त्यामुळे काही प्रमाणात फायदा होतोही, परंतु जर या नदीवर बोळधा कोरेगाव, एकलपूर, तुळशी, अरततोंडी या गावाशेजारी कायमस्वरूपी शिवकालीन बंधारे बांधले तर देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येणार नाही.शासनाच्या नियमानुसार एखाद्या ठिकाणापासून एक कि.मी. अंतरावरु न पाणी आणावे लागत असेल, तसेच प्रतिदिवशी दरडोई २० लिटरपेक्षा कमी पाणी मिळत असेल तर त्याला पाणी टंचाई म्हणतात. तशी परिस्थिती तालुक्यात कुठेही नाही. परंतु शासन नियमानुसार वर्तमानात असलेल्या सार्वजनिक विहीरी, हातपंप, नळ जलसाठयांपासून पाचशे मीटर अंतरावर ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय दुसरे नवीन जलस्त्रोत खोदण्यास मनाई आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी व आता उपविभागीय अधिकारी यांना जलसाठे संरक्षित करण्याचे अधिकार आहे. दरवर्षी संबंधित अधिकारी जलसाठयांना संरक्षित करतात. परंतु ग्रामपंचायतस्तरावर काही ठिकाणी दुर्लक्ष होते. त्यामुळे अवैध जलउपसा होतो. परिणामी कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. तालुक्यातील जलसाठ्यांवर ग्रामस्तरावरु न योग्य नियंत्रण ठेवल्यास व जलसाठ्यातील गाळ कचरा काढण्याच्या कामाला प्राधान्य दिल्यास पाणी टंचाईला सामना करण्याची परीस्थिती उद्भवू शकणार नाही.गावातील शासकीय हातपंप बिघडल्यास त्या हातपंपांना दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून खर्च होणारी हातपंप देखभाल दुरु स्ती योजना कार्यांन्वित आहे. प्रतिहातपंप ग्रामपंचायतला संपूर्ण वर्षासाठी दोन हजार रु पये भरावे लागते. मात्र देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या १९ ग्रामपंचायतवर हातपंप, वीजपंप आकारणीची रक्कम थकीत असल्याचे दिसते. नाममात्र रकमेचाही भरणा ग्रामपंचायतस्तरावरु न होताना दिसत नाही.भविष्यातील पाण्याचे नियोजन म्हणून गाढवी नदीवर शिवकालीन बंधारे बांधल्यास किनाऱ्याजवळील गावांना निश्चित वरदान ठरेल. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनीधींनी लक्ष देऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.नियोजनासाठी गावकऱ्यांचे सहकार्य गरजेचेसद्यस्थितीत देसाईगंज तालुक्यातील ३० महसुली गावे व ६ रिठ लक्षात घेता १४ ठिकाणी नळयोजना असून एका गावातील नळयोजना बंद आहे. १३ ठिकाणी दुहेरी पंपयोजना व दोन ठिकाणी विजपंप सुरु आहेत. देसाईगंज तालुक्याची पाणीपातळी यावर्षी खाली गेली आहे. विहिरी, हातपंप, दुहेरी पंपयोजना व काही गावांसाठी असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यांची संख्या पाहता यावर्षी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.पाणी हे जीवन आहे, त्याचे महत्व ओळखून पाणीपट्टी कर भरण्यास ग्रामपंचायतला लोकांनी सहकार्य केल्यास, ग्रामपंचायतने जलस्त्रोतांचा उपसा केल्यास, गावांचे हित लक्षात घेत अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. त्यासाठी जनजागृती करणेही गरजेचे आहे.