शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना धाडले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST

गडचिराेली : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी कामावर रुजू हाेण्याचा दिलेला आदेश घेऊन १८ जून राेजी सुमारे २२८ हंगामी क्षेत्र कर्मचारी ...

गडचिराेली : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी कामावर रुजू हाेण्याचा दिलेला आदेश घेऊन १८ जून राेजी सुमारे २२८ हंगामी क्षेत्र कर्मचारी कामाच्या ठिकाणी गेले असता, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे ताेंडी निर्देश असल्याचे सांगून प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावरील डाॅक्टरांनी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.

गडचिराेली जिल्ह्यात हिवताप रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. हिवताप आटाेक्यात आणण्यासाठी २०१५-१६ मध्ये सुमारे ८३९ कर्मचाऱ्यांची हंगामी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना त्यावर्षी जवळपास दाेन ते तीन महिन्यांचे काम मिळाले हाेते. त्यानंतर मात्र काम मिळणे बंद झाले हाेते. काही जुन्या फवारणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम चालविले जात हाेते. मे महिन्यात या जुन्या कर्मचाऱ्यांना फवारणी करण्याचे निर्देश जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले. मात्र, वाढीव मजुरीची मागणी करून ते रुजू झाले नाहीत. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी २०१५-१६ नियुक्त केलेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी २२८ कर्मचाऱ्यांना १८ जून राेजी रुजू हाेण्याचे निर्देश दिले. नवीन कर्मचारी रुजू झाल्यास आपला राेजगार हिरावला जाईल, या भीतीने आंदाेलन करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या मजुरीवरच काम करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यात आली नाही. नवीन कर्मचारी रुजू हाेण्यास गेले असता, संबंधित तालुका आराेग्य अधिकारी, हिवताप निरीक्षकांनी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे निर्देश असल्याने आपण रुजू करून घेऊ शकत नाही, असे सांगून रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हिरमाेड हाेऊन त्यांना परत जावे लागले, तसेच बरेच कर्मचारी शिधा व इतर साहित्य धरून गेले हाेते. त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याबद्दल हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्याला रुजू करून न घेतल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

बाॅक्स....

दुसऱ्या जिल्ह्यातील मजुरांना नियुक्ती

जुने कर्मचारी असल्याने त्यांना काम करताना प्राधान्य दिले जाते. मात्र, यातील बहुतांश कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यांतील आहेत. गडचिराेली जिल्ह्यात अगाेदरच बेराेजगारी असताना दुसऱ्या जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांची का नियुक्ती केली जाते, असा प्रश्न नवीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जुन्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे ते व्यवस्थित काम करीत नाहीत. तीन दिवसांत रुजू हाेण्याचे निर्देश नियुक्ती आदेशात दिलेले राहतात. मात्र, हे कर्मचारी धानाचे राेवणे झाल्यावर रुजू हाेऊन फवारणीची कामे करतात. ताेपर्यंत मलेरियाचा प्रसार झालेला राहतो, असाही आराेप नवीन कर्मचाऱ्यांनी केला आहे.

काेट....

जुने कर्मचारी रुजू हाेण्यास तयार नव्हते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना रुजू आदेश देण्यात आले. त्यानंतर मात्र जुन्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास सहमती दर्शविली. जिल्हा परिषद अध्यक्षांनी जुन्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे निर्देश दिले, तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या वेळी प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे वेळेवर नवीन कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश रद्द करावा लागला.

-डाॅ. कुणाल माेडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिराेली