शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनखोडातील रस्ते बनले चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : आवागमनासाठी नागरिक व वाहनधारकांना होताहे त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील अंतर्गत रस्त्यांची पाऊस व चिखलामुळे वाट लागली आहे. परिणामी आवागमन करणारे नागरिक व वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आहेत. काही जणांचे दुचाकी वाहन सदर चिखलमय रस्त्यात फसत असल्याचे दिसून येत आहे. सदर गावातील नाल्या बुजलेल्या असल्याने नालीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर मुख्य रस्त्यावरून वृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ दरवर्षी राहते. सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.आष्टी परिसरातील अनखोडा हे मोठे गाव असून मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे परिसरातील १० ते १२ गावातील लोक अनखोडावरूनच पुढच्या गावाला जातात. विविध कार्यक्रमानिमित्त बरेच लोकप्रतिनिधी या गावात येऊन गेले. त्यांनी गावातील समस्याही पाहिल्या. मात्र या समस्या मार्गी लावण्यासाठी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधींसोबतच प्रशासनाचेही रस्ता दुरूस्ती व इतर विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष होत आहे.परिणामी पावसाळ्याच्या दिवसात गावातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा