शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

चव्हेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:26 IST

गेल्या ३३ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात एकही मध्यम व मोठा सिंचन प्रकल्प मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र १९८० च्या वनकायद्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.

ठळक मुद्दे९० टक्के काम पूर्ण : घर बांधकामासाठी मिळणार रोख रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : गेल्या ३३ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात एकही मध्यम व मोठा सिंचन प्रकल्प मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र १९८० च्या वनकायद्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. वनक्षेत्राच्या मोबदल्यात वन विभागाची एनपीव्हीची रक्कम ८०२ लाख रूपये इतकी आहे. प्रशासनाने गतीने कार्यवाही करून सदर सिंचन प्रकल्पाचे काम हाती घेतले असून आता हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना घर बांधकामासाठी रोख रक्कम मिळणार असल्याने चव्हेला पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.सदर सिंचन प्रकल्पामुळे ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र सदर सिंचन प्रकल्पामुळे चव्हेला हे १२० घरांचे गाव पूर्णत: बुडीत क्षेत्रात येणार असून येथील घरे पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे चव्हेला गावाचे पुनर्वसन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या गावाचे आदी पुनर्वसन करा, घरांचे मूल्यमापन करून घर बांधकामासाठी रक्कम द्या, तसेच ज्याप्रमाणे शहरात जमिनीला भाव दिला जातो. त्याच आधारावर प्रती हेक्टर ८ ते १२ लाख रूपये इतका मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चव्हेलावासीयांनी लावून धरली. त्यामुळे काही वर्ष हा प्रकल्प थंडबस्त्यात होता. मात्र येथील प्रकल्पग्रस्तांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सदर प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.सद्य:स्थितीत चव्हेला सिंचन प्रकल्पाचे (धरणाचे) काम ९० टक्के पूर्ण झाले असून केवळ गेट बांधावयाचे काम शिल्लक आहे. प्रकल्पग्रस्तांना घराचे बांधकाम करता यावे, यासाठी मांगदा-आरमोरी मुख्य मार्गालगत कोसरी गावाशेजारी जागेची खरेदी करून शासनाने भूखंड पाडले आहेत. मात्र या भूखंडाचे प्रकल्पग्रस्तांना व्यक्तीशा वाटप अद्यापही झाले नाही. सदर भूखंडाच्या परिसरात दोन विहिरी व पाण्याच्या एका मोठ्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे.घरांची किंमत तीन लाखांपासून ४० लाखांपर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांना मूल्यमापनातून निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता शासनाने जलदगतीने पावले उचलून कोसरी सिंचन प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सदर सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकºयांना सोयीचे होणार आहे.शेतजमीन मोबदल्याचा गुंता कायमचव्हेला धरण (सिंचन) प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासन व प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना घर बांधकाम करण्यासाठी भूखंड तयार केले आहेत. मात्र सदर प्रकल्पामुळे ज्या शेतकºयांची अनेक हेक्टर शेतजमीन जाणार आहे. त्या जमिनीला कोणत्या भावाने मोबदला अदा करायचा, याचा निर्णय अद्यापही झाला नाही. त्यामुळे शेतजमीन मोबदल्याचा गुंता सध्यातरी कायम असल्याचे दिसून येते.