लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच जागृत राहीले पाहिजे. रुग्णाला तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालये संबंध साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळकरणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. उष्माघात झाल्यानंतर थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता , बेशुद्वावस्था आदी लक्षणे दिसून येतात. उष्माघात होऊ नये, यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे वापरावेत, काळया किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत. सैल, पांढºया रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हामध्ये काम करताना मधून मधून थोडीशी विश्रांती घ्यावी, उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आवाहन डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.उष्माघात झाल्यानंतर हे उपाय कराउष्माघात झाल्यानंतर रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर सुरू करावे, शक्य असल्यास वातानुकूलीत खोलीत ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन लावावेत. हे उपाय केल्यास उष्माघात नियंत्रणात येण्यास मदत होते. या घरगुती उपायाबरोबरच नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. तसेच जवळपासच्या रूग्णालयास संबंधित रूग्णाला तत्काळ भरती करावे.
उष्माघातापासून बचाव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:56 IST
१ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच जागृत राहीले पाहिजे.
उष्माघातापासून बचाव करा
ठळक मुद्देउन्हात काम करणे टाळा : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला