शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आराखडा तयार

By admin | Updated: January 17, 2015 01:32 IST

नगर रचना विभागाने गडचिरोली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार केला असून सदर आराखड्यास नगर सचिवांची मंजुरी मिळाल्यानंतर शहराचा सुनियोजित विस्तार केला जाणार आहे.

दिगांबर जवादे गडचिरोलीनगर रचना विभागाने गडचिरोली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार केला असून सदर आराखड्यास नगर सचिवांची मंजुरी मिळाल्यानंतर शहराचा सुनियोजित विस्तार केला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर गडचिरोली येथे अनेक कार्यालये आली. कार्यालयामध्ये काम करणारे हजारो अधिकारी व कर्मचारी गडचिरोली येथे वास्तव्यास राहू लागले. परिणामी गडचिरोली शहराची लोकसंख्या १९८१ नंतर झपाट्याने वाढायला लागली. शहराचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी गडचिरोली शहराचा १९९१ साली पहिला शहर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. सदर आराखड्याची मुदत २०११ साली संपली. मागील वर्षीपासून नगर रचना विभागाने शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. विकास आराखडा तयार करणे अत्यंत किचकट बाब आहे. नगर रचना विभागाकडून संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पुढील २० वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या किती प्रमाणात वाढेल, यासाठी शासकीय कार्यालयांना किती जागा आरक्षित ठेवावी लागेल, घर बांधकामासाठी व शासकीय कार्यालयांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेमध्ये पूर येतो काय याची शहानिशा करण्यात आली आहे. त्यानुसारच रहिवासी, शासकीय कार्यालये यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. शहराच्या नवीन विकास आराखड्यामध्ये शहराच्या सभोवतालच्या शेत जमिनीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र खासगी मालकीची शेत जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगर परिषदेमध्ये स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्यानंतर नगर रचना विभागाने शहराच्या विकासाचा कच्चा आराखडा नकाशाच्या स्वरूपात तयार केला आहे. सदर आराखडा नगर परिषद कार्यालयात नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात आला आहे. नगर विकास आराखडा तयार करण्यासाठी नगर परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या देखरेखीखालीच नगर विकास आराखड्याची रचना नगर विकास विभागाने केली आहे. या नगर विकास आराखड्यास गडचिरोली नगर परिषदेने मंजुरी दिली असून सदर आराखडा आता अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या नगर रचना सचिवांकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर सदर विकास आराखड्यास अंतिम स्वरूप प्राप्त होऊन त्यानुसार पुढील २० वर्षांपर्यंत याच आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्द विस्तार केला जाणार आहे. विसापूर-नवेगाव मार्गावर सर्वाधिक विस्तारशहराच्या उत्तर दिशेला कठाणी नदी आहे. पूर्व व दक्षिणेला वनविभागाचे आरक्षित जंगल आहे. त्यामुळे या भागात शहराच्या विस्ताराला वाव नाही. परिणामी नवीन विकास आराखड्यात नवेगाव, कोटगल, विसापूर परिसरातील शेतजमिनींचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी यापुढेही शहराचा विस्तार याच भागाकडे होण्याची शक्यता आहे. या भागात आगामी काळात जमिनीचे भाव वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.पूर प्रभावित भागात बांधकाम जोरातगडचिरोली शहराजवळून कठाणी नदी वाहते. या नदीचा पूर दरवर्षीच गडचिरोली शहराजवळ येतो. त्यामुळे या भागाला ‘फ्लडझोन’ म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या भागात घरांचे बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही काही बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची दिशाभूल करीत या परिसरातील जागा विकल्या आहेत. विशेष म्हणजे, नवीन शहर विकास आराखड्यातही या भागाला ‘फ्लड झोन’ म्हणूनच घोषीत केले आहे. जुन्याच आराखड्यानुसार सध्या विस्तार १९९१ साली तयार करण्यात आलेल्या आराखड्याची मुदत २०११ सालीच संपली. नगर रचना विभागाने तत्पुर्वीच पूर्व तयार करून २०१२ साली नवीन आराखडा तयार करणे आवश्यक होते. मात्र सदर आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून जुन्याच आराखड्याप्रमाणे शहरात विकासकामे केली जात आहेत. हे बांधकाम भविष्यात धोक्याचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.