शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

नांगरणी करायची? मग माेजा प्रतितास ९०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मान्सूनपूर्ण  पावसामुळे शेतजमिनीत थोडा ओलसरपणा आला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात यासाठी लागणारे ट्रॅक्टर भाडे प्रतितास ९०० रुपये घेतले जात असून गतवर्षीपेक्षा  १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काही ट्रॅक्टर मालक प्रतितास ९५० रुपये भाडे घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरुपात रोजगार उपलब्ध झाला आहे.धान पिकासोबतच कपाशी पिकाची लागवडसुद्धा शेतकरी करीत असतात. मृगाचा अपेक्षित पाऊस झाला तर लागवड करणे सोयीचे होत असते. त्यामुळे कपाशी लागवड करणाऱ्या शेतजमिनीत नांगरणी केली जात आहे. दरवर्षी काही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते;मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी- बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेतजमीन करण्यास शेतकरी कानाडोळा करीत आहेत. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत चालला आहे.शेती व्यवसायाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अधिक शेती असणारे बरेच शेतकरी आपली अर्धीअधिक शेती दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर देत आहेत. १० एकरपैकी २ एकर स्वत: करायची व ८ एकर शेती ठेक्याने मशागत व पीक लागवडीसाठी द्यायची, असा प्रकार ग्रामीण भागात सुरू आहे. 

शेतजमीन स्वच्छतेवर भर -    गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सध्या प्रचंड तापमान असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर सकाळच्या सुमारास शेतावर जाऊन शेताची स्वच्छता करीत आहेत. काडीकचरा जाळणे, पाळे स्वच्छ करणे, काटेरी झुडपांची ताेड करणे आदी कामे सुरू आहेत. जून महिन्यात पहिला पाऊस झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात हाेणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती