शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

पेन्शन योजना सात हजार लाभार्थ्यांवरच रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीचे कोणतेही लाभ मिळत नाही. त्यामुळे वृध्दापकाळात त्यांची फार मोठी वाताहात होते. या वर्गाला पेन्शनचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली. सुरूवातीला योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात आला. या योजनेचे लाभार्थी बनविण्यासाठी प्रत्येक बँकेला व विभागांना उद्दिष्ट देण्यात आले होते.

ठळक मुद्देप्रचार व प्रसिद्धीकडे दुर्लक्ष : असंघटित कामगारांसाठी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठा गाजावाजा करून केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. चार वर्षाच्या कालावधीत केवळ ७ हजार ५०० लाभार्थी झाले आहेत. या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीकडे शासनासह प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याने या योजनेचा विस्तार रखडला आहे.असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीचे कोणतेही लाभ मिळत नाही. त्यामुळे वृध्दापकाळात त्यांची फार मोठी वाताहात होते. या वर्गाला पेन्शनचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली. सुरूवातीला योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात आला. या योजनेचे लाभार्थी बनविण्यासाठी प्रत्येक बँकेला व विभागांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे सुरूवातीला काही नागरिकांनी या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज केले. या योजने नंतर केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या. त्या योजनांकडे प्रशासन व शासनाने लक्ष वेधले. मात्र या योजनेकडे दुर्लक्ष केले. परिणामी या योजनेचा विस्तार रखडला आहे.लाभार्थ्याला काही रक्कम गुंतवायची आहे. त्याच्या गुंतवणुकीनुसार ६० वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळणार आहे. कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा प्रावधान या योजनेत आहे. गडचिरोली जिल्ह्यात असंघटीत क्षेत्रात काम करणाºया नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. व्यक्तीला म्हातारपणातच खºया अर्थाने पैशाची गरज राहते. १८ ते ४० वयापर्यंतचे नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वयानुसार वेगवेगळे गट पाडण्यात आले आहेत. त्यानुसार लाभार्थ्याला रक्कम भरायची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ बँक खाते असणे गरजेचे आहे. त्याच्या बँक खात्यातूनच विम्याची राशी वजा होते. त्यामुळे विम्याचे हप्ते भरण्यासाठी अतिरिक्त श्रम करण्याची गरज नाही. मात्र त्या खात्यात योग्य रक्कम असणे आवश्यक आहे.ग्रामीण बँकेचे सर्वाधिक लाभार्थीसर्व राष्टÑीयकृत बँकांना विमा काढण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. सुरूवातीच्या कालावधीत बँकांनी प्रत्येक बँक खातेदाराला विमा काढण्याबाबत सांगत होते. त्यामुळे सुरूवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद नागरिकांनी दर्शविला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा ग्रामीण भागातच अधिक आहेत. या भागातील नागरिकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दर्शवित सुमारे ४ हजार नागरिकांनी विमा काढला. इतर बँकांचे लाभार्थी मात्र ११०० पेक्षा कमीच आहेत.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन