शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार शाळा भौतिक सुविधेत नापास

By admin | Updated: January 15, 2015 22:50 IST

शिक्षणाचा अधिकार कायदा महाराष्ट्र शासनाने सन २०१० मध्ये अंमलात आणला. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी १० निकष ठरविण्यात आले. सप्टेंबर २०१३ च्या अहवालानुसार

दिलीप दहेलकर - गडचिरोलीशिक्षणाचा अधिकार कायदा महाराष्ट्र शासनाने सन २०१० मध्ये अंमलात आणला. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी १० निकष ठरविण्यात आले. सप्टेंबर २०१३ च्या अहवालानुसार हे दहा निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची संख्या ४३२ आहे. उर्वरित एक हजार ६१६ शाळांनी संबंधीत निकष पूर्ण केले नसल्याची माहिती पुढे आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगर परिषद, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांची एकूण संख्या दोन हजार ४८ आहे. यापैकी भौतिक सुविधांचे नऊ निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची संख्या ५८३ आहे. आठ निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची संख्या ५३६ आहे. सात निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची संख्या २९२ आहे. सहा निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची संख्या १२९ आहे. जिल्ह्यातील एक हजार ६१६ शाळांनी भौतिक सुविधांचे निकष पूर्ण केले नाही. त्यामु या शाळांतील विद्यार्थ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. २०१० च्या राज्य शासनाच्या आरटीई कायद्यांतर्गत भौतिक सुविधांचे दहा निकष ठरविण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीकरिता या कायद्याची अंमलबजावणी केली जाते. दहा निकषामध्ये शाळेची स्वतंत्र इमारत त्यात वर्ग, शौचालय, किचन शेड, संरक्षण भिंत, रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सोय, खेळासाठी मैदान, मुख्याध्यापक कक्ष, ग्रंथालय व विद्युत पुरवठा आदींचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१३ च्या अहवालानुसार संपूर्ण २४८ शाळांना स्वतंत्र इमारत आहेत. एक हजार ८०९ शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे कक्ष आहे. तर २३९ शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे स्वतंत्र कक्ष नाही. शाळांमध्ये ६५६ वर्गखोल्यांची कमतरता आहे. एक हजार ४२६ शाळांमध्ये रॅम्पची व्यवस्था आहे. तर ६२२ शाळांमध्ये रॅम्पची व्यवस्था नाही. एक हजार ९२० शाळांमध्ये मुलांसाठी शौचालय आहे. तर १२८ शाळांमध्ये मुलांसाठी शौचालय नाही. एक हजार ७८५ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय आहे. तर २६३ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय नाही. पिण्याच्या पाण्याची सोय सर्वच शाळांमध्ये आहे. दोन हजार ४८ शाळांपैकी एक हजार ७२८ शाळांमध्ये किचन शेडची व्यवस्था आहे. तर ३२० शाळांमध्ये किचन शेडचा अभाव आहे. एक हजार ५६६ शाळांना संरक्षण भिंत आहे. मात्र प्रदीर्घ वर्षानंतरही जिल्ह्यातील ४८२ शाळांना संरक्षण भिंत नसल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. परिणामी शालेय परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो. एक हजार २८४ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदानाची व्यवस्था आहे. तर ७६४ शाळांमध्ये अद्यापही खेळाच्या मैदानाची व्यवस्था नाही.