शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

काेराेनाची साथ राेखताना नऊ महिने दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान ...

गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान लिलया पेलत आरोग्य विभागाने वर्षअखेर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले. गेल्या ९ महिन्यात झालेली आरोग्य विभागाची दमछाक अजून थांबलेली नसली तरी नवीन वर्षात ती पूर्णपणे थांबेल अशी आशा सर्वांना आहे.

२०२० हे वर्ष नागरिकांसाेबतच आराेग्य कर्मचाऱ्यांनाही स्मरणात राहणारे ठरले. गडचिराेली जिल्ह्यात १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यापूर्वीही आराेग्य यंत्रणा काेराेनाची साथ पसरणार नाही, यासाठी जिल्हाभरात प्रयत्न करत हाेती. गडचिराेली जिल्ह्यात कुपाेषण, रक्ताक्षय, मलेरिया रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच आराेग्य यंत्रणेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान आराेग्य यंत्रणेवर कामाचा लाेड अधिक आहे. अशातच काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आराेग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. काेराेना रूग्णापासून सख्खे नातेवाईक अंतर ठेवून राहत हाेते. शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. अशाही स्थितीत आराेग्य यंत्रणा मात्र प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करीत हाेते. यातील अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली. मात्र न डगमगता या यंत्रणेने जिल्ह्यात काम केले. जिल्ह्यात दिवाळीच्या आधी क्रियाशिल रुग्णांची संख्या १ हजाराच्या घरात होती. ती आता २०० पेक्षा कमी झाली आहे. येत्या काही दिवसात ती शून्य झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा रूग्णालयाला अनेक नवीन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मिळाल्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी ३ ते ४ दिवसांची प्रतीक्षा करणे थांबले. काेराेनाची साथ संपेल तरीही या मशीन जिल्हा रूग्णालयातच राहणार असल्याने भविष्यात त्यांचा वापर इतर रूग्णांसाठी हाेऊ शकणार आहे.

बाॅक्स

काेराेनामुळे आली आराेग्यविषयक जागृती

काेराेनाच्या साथीमुळे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे जरी मान्य केले तरी काेराेनाने काही सकारात्मक बाबी शिकविल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नागरिकांमध्ये आराेग्यविषयक जागृती निर्माण झाली. अनेकांनी मास्कचा वापर सुरू केल्याने धुळीपासून हाेणारा त्रास वाचला. तसेच काेराेनासाेबत इतर संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव झाला. अनेकांना आता मास्क घालण्याची सवय झाली आहे. राेग प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी संतुलीत आहार, व्यायाम या बाबींची नागरिकांमध्ये जागृती झाली. तसेच आयुर्वेदाने सांगितलेल्या काढ्याचा वापर पुन्हा सुरू झाला.