शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

काेराेनाची साथ राेखताना नऊ महिने दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान ...

गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान लिलया पेलत आरोग्य विभागाने वर्षअखेर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले. गेल्या ९ महिन्यात झालेली आरोग्य विभागाची दमछाक अजून थांबलेली नसली तरी नवीन वर्षात ती पूर्णपणे थांबेल अशी आशा सर्वांना आहे.

२०२० हे वर्ष नागरिकांसाेबतच आराेग्य कर्मचाऱ्यांनाही स्मरणात राहणारे ठरले. गडचिराेली जिल्ह्यात १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यापूर्वीही आराेग्य यंत्रणा काेराेनाची साथ पसरणार नाही, यासाठी जिल्हाभरात प्रयत्न करत हाेती. गडचिराेली जिल्ह्यात कुपाेषण, रक्ताक्षय, मलेरिया रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच आराेग्य यंत्रणेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान आराेग्य यंत्रणेवर कामाचा लाेड अधिक आहे. अशातच काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आराेग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. काेराेना रूग्णापासून सख्खे नातेवाईक अंतर ठेवून राहत हाेते. शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. अशाही स्थितीत आराेग्य यंत्रणा मात्र प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करीत हाेते. यातील अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली. मात्र न डगमगता या यंत्रणेने जिल्ह्यात काम केले. जिल्ह्यात दिवाळीच्या आधी क्रियाशिल रुग्णांची संख्या १ हजाराच्या घरात होती. ती आता २०० पेक्षा कमी झाली आहे. येत्या काही दिवसात ती शून्य झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा रूग्णालयाला अनेक नवीन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मिळाल्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी ३ ते ४ दिवसांची प्रतीक्षा करणे थांबले. काेराेनाची साथ संपेल तरीही या मशीन जिल्हा रूग्णालयातच राहणार असल्याने भविष्यात त्यांचा वापर इतर रूग्णांसाठी हाेऊ शकणार आहे.

बाॅक्स

काेराेनामुळे आली आराेग्यविषयक जागृती

काेराेनाच्या साथीमुळे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे जरी मान्य केले तरी काेराेनाने काही सकारात्मक बाबी शिकविल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नागरिकांमध्ये आराेग्यविषयक जागृती निर्माण झाली. अनेकांनी मास्कचा वापर सुरू केल्याने धुळीपासून हाेणारा त्रास वाचला. तसेच काेराेनासाेबत इतर संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव झाला. अनेकांना आता मास्क घालण्याची सवय झाली आहे. राेग प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी संतुलीत आहार, व्यायाम या बाबींची नागरिकांमध्ये जागृती झाली. तसेच आयुर्वेदाने सांगितलेल्या काढ्याचा वापर पुन्हा सुरू झाला.