शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

काेराेनाची साथ राेखताना नऊ महिने दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान ...

गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान लिलया पेलत आरोग्य विभागाने वर्षअखेर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले. गेल्या ९ महिन्यात झालेली आरोग्य विभागाची दमछाक अजून थांबलेली नसली तरी नवीन वर्षात ती पूर्णपणे थांबेल अशी आशा सर्वांना आहे.

२०२० हे वर्ष नागरिकांसाेबतच आराेग्य कर्मचाऱ्यांनाही स्मरणात राहणारे ठरले. गडचिराेली जिल्ह्यात १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यापूर्वीही आराेग्य यंत्रणा काेराेनाची साथ पसरणार नाही, यासाठी जिल्हाभरात प्रयत्न करत हाेती. गडचिराेली जिल्ह्यात कुपाेषण, रक्ताक्षय, मलेरिया रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच आराेग्य यंत्रणेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान आराेग्य यंत्रणेवर कामाचा लाेड अधिक आहे. अशातच काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आराेग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. काेराेना रूग्णापासून सख्खे नातेवाईक अंतर ठेवून राहत हाेते. शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. अशाही स्थितीत आराेग्य यंत्रणा मात्र प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करीत हाेते. यातील अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली. मात्र न डगमगता या यंत्रणेने जिल्ह्यात काम केले. जिल्ह्यात दिवाळीच्या आधी क्रियाशिल रुग्णांची संख्या १ हजाराच्या घरात होती. ती आता २०० पेक्षा कमी झाली आहे. येत्या काही दिवसात ती शून्य झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा रूग्णालयाला अनेक नवीन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मिळाल्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी ३ ते ४ दिवसांची प्रतीक्षा करणे थांबले. काेराेनाची साथ संपेल तरीही या मशीन जिल्हा रूग्णालयातच राहणार असल्याने भविष्यात त्यांचा वापर इतर रूग्णांसाठी हाेऊ शकणार आहे.

बाॅक्स

काेराेनामुळे आली आराेग्यविषयक जागृती

काेराेनाच्या साथीमुळे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे जरी मान्य केले तरी काेराेनाने काही सकारात्मक बाबी शिकविल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नागरिकांमध्ये आराेग्यविषयक जागृती निर्माण झाली. अनेकांनी मास्कचा वापर सुरू केल्याने धुळीपासून हाेणारा त्रास वाचला. तसेच काेराेनासाेबत इतर संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव झाला. अनेकांना आता मास्क घालण्याची सवय झाली आहे. राेग प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी संतुलीत आहार, व्यायाम या बाबींची नागरिकांमध्ये जागृती झाली. तसेच आयुर्वेदाने सांगितलेल्या काढ्याचा वापर पुन्हा सुरू झाला.