शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

By admin | Updated: May 25, 2015 01:53 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली.

गडचिरोली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातूनच पाणीसाठा उपसा करून रेगडी गावातील १७० व विकासपल्ली गावातील १८० हेक्टर क्षेत्रास सिंचन करण्याच्या दृष्टीने रेगडी विकासपल्ली ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची असून मागील चार वर्षात केवळ ३० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन या योजनेमुळे होऊ शकले. या योजनेचे अनेक किरकोळ काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले आहे. राज्य सरकारचे ही योजना पूर्ण करण्याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करीत आहे. ११ एप्रिल १९९० ला ६८.७३ लक्ष रूपये किमतीच्या रेगडी विकासपल्ली उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टर राहणार होती. सन २०१४-१५ पर्यंत पूर्वीचा शिल्लक धरून ७२.६७ लक्ष रूपयांचा निधी या योजनेकरिता मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाकरिता १४.९२० हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता असून जमीन संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. ६८.७३ लक्ष रूपये निधीच्या मूळ प्रस्तावास ११ एप्रिल १९९० ला मान्यता देण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाची ठरवलेली ही किंमत १९८८-८९ च्या दरसूचीनुसार निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर सुधारित मान्यतेसाठी व वाढीव निधीच्या रकमेसह प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १०५२.०० लक्ष रूपये होती. आॅक्टोबर २०१४ अखेरपर्यंत ९३३.३६ लक्ष रूपये या उपसा सिंचन योजनेवर खर्च झाले. प्रकल्पाची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची आहे. मात्र योजनेचे शिर्षकामे पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये चाचणी करण्यात आली. त्यानंतर सलग चार वर्षे सिंचन क्षमतेपेक्षा अत्यल्प सिंचन या उपसा सिंचन योजनेतून झालेले आहे. २०११-१२ मध्ये केवळ ३४ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ३५ हेक्टर तर २०१३-१४ मध्ये केवळ दोन हेक्टर व २०१४-१५ मध्ये ३० हेक्टर सिंचन या योजनेतून झाले. सदर योजनेवर ९० अश्वशक्तीचे चार पंप आहे. पैकी दोनच पंप कार्यान्वित होते. दोनपंपाचे स्टॉर्टर बंद स्थितीत असल्याने व एका पंपाची वायरिंग जळालेली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. योजनेची कामे पूर्ण झाले असून राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे सुधारित प्रशासकीय मान्यता असल्याचे कळविले नसल्याने प्रकल्पाचे किरकोळ दुरूस्ती काम सध्या बंद झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)