शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

By admin | Updated: May 25, 2015 01:53 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली.

गडचिरोली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातूनच पाणीसाठा उपसा करून रेगडी गावातील १७० व विकासपल्ली गावातील १८० हेक्टर क्षेत्रास सिंचन करण्याच्या दृष्टीने रेगडी विकासपल्ली ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची असून मागील चार वर्षात केवळ ३० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन या योजनेमुळे होऊ शकले. या योजनेचे अनेक किरकोळ काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले आहे. राज्य सरकारचे ही योजना पूर्ण करण्याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करीत आहे. ११ एप्रिल १९९० ला ६८.७३ लक्ष रूपये किमतीच्या रेगडी विकासपल्ली उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टर राहणार होती. सन २०१४-१५ पर्यंत पूर्वीचा शिल्लक धरून ७२.६७ लक्ष रूपयांचा निधी या योजनेकरिता मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाकरिता १४.९२० हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता असून जमीन संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. ६८.७३ लक्ष रूपये निधीच्या मूळ प्रस्तावास ११ एप्रिल १९९० ला मान्यता देण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाची ठरवलेली ही किंमत १९८८-८९ च्या दरसूचीनुसार निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर सुधारित मान्यतेसाठी व वाढीव निधीच्या रकमेसह प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १०५२.०० लक्ष रूपये होती. आॅक्टोबर २०१४ अखेरपर्यंत ९३३.३६ लक्ष रूपये या उपसा सिंचन योजनेवर खर्च झाले. प्रकल्पाची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची आहे. मात्र योजनेचे शिर्षकामे पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये चाचणी करण्यात आली. त्यानंतर सलग चार वर्षे सिंचन क्षमतेपेक्षा अत्यल्प सिंचन या उपसा सिंचन योजनेतून झालेले आहे. २०११-१२ मध्ये केवळ ३४ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ३५ हेक्टर तर २०१३-१४ मध्ये केवळ दोन हेक्टर व २०१४-१५ मध्ये ३० हेक्टर सिंचन या योजनेतून झाले. सदर योजनेवर ९० अश्वशक्तीचे चार पंप आहे. पैकी दोनच पंप कार्यान्वित होते. दोनपंपाचे स्टॉर्टर बंद स्थितीत असल्याने व एका पंपाची वायरिंग जळालेली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. योजनेची कामे पूर्ण झाले असून राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे सुधारित प्रशासकीय मान्यता असल्याचे कळविले नसल्याने प्रकल्पाचे किरकोळ दुरूस्ती काम सध्या बंद झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)