शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

By admin | Updated: May 25, 2015 01:53 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली.

गडचिरोली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातूनच पाणीसाठा उपसा करून रेगडी गावातील १७० व विकासपल्ली गावातील १८० हेक्टर क्षेत्रास सिंचन करण्याच्या दृष्टीने रेगडी विकासपल्ली ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची असून मागील चार वर्षात केवळ ३० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन या योजनेमुळे होऊ शकले. या योजनेचे अनेक किरकोळ काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले आहे. राज्य सरकारचे ही योजना पूर्ण करण्याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करीत आहे. ११ एप्रिल १९९० ला ६८.७३ लक्ष रूपये किमतीच्या रेगडी विकासपल्ली उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टर राहणार होती. सन २०१४-१५ पर्यंत पूर्वीचा शिल्लक धरून ७२.६७ लक्ष रूपयांचा निधी या योजनेकरिता मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाकरिता १४.९२० हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता असून जमीन संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. ६८.७३ लक्ष रूपये निधीच्या मूळ प्रस्तावास ११ एप्रिल १९९० ला मान्यता देण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाची ठरवलेली ही किंमत १९८८-८९ च्या दरसूचीनुसार निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर सुधारित मान्यतेसाठी व वाढीव निधीच्या रकमेसह प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १०५२.०० लक्ष रूपये होती. आॅक्टोबर २०१४ अखेरपर्यंत ९३३.३६ लक्ष रूपये या उपसा सिंचन योजनेवर खर्च झाले. प्रकल्पाची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची आहे. मात्र योजनेचे शिर्षकामे पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये चाचणी करण्यात आली. त्यानंतर सलग चार वर्षे सिंचन क्षमतेपेक्षा अत्यल्प सिंचन या उपसा सिंचन योजनेतून झालेले आहे. २०११-१२ मध्ये केवळ ३४ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ३५ हेक्टर तर २०१३-१४ मध्ये केवळ दोन हेक्टर व २०१४-१५ मध्ये ३० हेक्टर सिंचन या योजनेतून झाले. सदर योजनेवर ९० अश्वशक्तीचे चार पंप आहे. पैकी दोनच पंप कार्यान्वित होते. दोनपंपाचे स्टॉर्टर बंद स्थितीत असल्याने व एका पंपाची वायरिंग जळालेली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. योजनेची कामे पूर्ण झाले असून राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे सुधारित प्रशासकीय मान्यता असल्याचे कळविले नसल्याने प्रकल्पाचे किरकोळ दुरूस्ती काम सध्या बंद झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)