शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्त्याचा लिलाव केवळ देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 02:20 IST

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तेंदूपत्त्याची लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे.

मर्जीतील कंत्राटदारांसाठी कोरम नसल्याचे सांगून लिलाव होतो रद्द गडचिरोली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तेंदूपत्त्याची लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र ही प्रक्रिया केवळ देखावा ठरत चालली असून मर्जीतील कंत्राटदारालाच तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट मिळत आहेत. ग्रामकोष व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ठरवतील त्याच कंत्राटदाराला कंत्राट मिळत असल्याने गावाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकार घडत आहेत. पेसा कायद्यांतर्गत गावांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आले आहेत. मागील वर्षी लिलाव प्रक्रिया न राबविताच अनेक गावांनी कंत्राटदार सांगेल, त्या किमतीला तेंदूपत्ता विकला होता. या गावांना वन विभागाच्या तुलनेत अतिशय कमी भाव मिळाला होता. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर यावर्षीच्या हंगामात वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाहीर लिलाव केल्याशिवाय तेंदूपत्ता विकल्या जाऊ नये, असे निर्देश दिले. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये लिलावाच्या जाहिराती देऊन लिलाव प्रक्रिया राबवित आहेत. वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित होताच त्या गावामध्ये संबंधित दिवशी तेंदू कंत्राटदार पोहोचत आहेत. बोली लागल्यास तेंदूपत्त्याचा भाव वाढेल. त्याचबरोबर पूर्वीच निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळणार नाही, ही बाब लक्षात घेऊन लिलाव ठेवलेल्या दिवशी ग्रामकोष किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जाणूनबुजून अनुपस्थितीत राहत आहेत. ग्रामसभेच्या नियमानुसार कोरम पूर्ण झाले नाही म्हणून त्या दिवशीचा लिलाव रद्द केला जात आहे. त्यानंतर आपसी संगणमत करून लिलावाची पुढची तारीख ठरविली जात आहे. ती तारीख मर्जीतीलच कंत्राटदाराला सांगितली जाते. त्या दिवशी मर्जीतील एकटाच कंत्राटदार उपस्थित राहत असल्याने त्याला तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट दिले जात आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या ग्रामसभेला कोरमची गरज पडत नाही. हे कारण या मागे पुढे केले जात आहे. आजपर्यंत ज्या ग्रामपंचायतींनी लिलाव केले आहेत. त्यापैकी ८० टक्के ग्रामपंचायतींनी अशा पध्दतीने सेटलमेंट करून तेंदूचे लिलाव केले आहेत. त्यामुळे संबंधित गावांना इतर गावांच्या तुलनेत कमी भाव मिळाला आहे. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालले आहेत. व लिलावाची प्रक्रिया केवळ देखावा ठरत चालली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी) कमिशनच्या लालसेने पदाधिकारी ‘मॅनेज’ तेंदूपत्ता लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम ग्रामकोषचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच सचिव यांच्याकडून पार पाडले जाते. या जवळपास १० पदाधिकाऱ्यांना एक लाख रूपयांत मॅनेज केल्यास कंत्राटदाराला कमीतकमी २० ते ३० लाख रूपयांचा नफा होतो. तेंदूपत्ता कमी किंमतीत विकल्या गेल्याने गावाला मात्र लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. थोड्याशा पैशाच्या लालसेपोटी कोट्यवधी रूपयांचा तेंदूपत्ता कमी भावाने विकण्याचे पाप ग्रामकोष व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी करीत आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार ४४ गावे स्वत: तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत. या संपूर्ण गावांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पहिल्या लिलावाच्या वेळीच लिलाव प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी लिलावादरम्यान जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी जबाबदार नागरिकांकडून करण्यात येत आहे. तेंदूपत्ता दराबाबत गावकरी अनभिज्ञ तेंदूपत्ताअभावी देशभरातील बिडीचे कारखाने मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. राष्ट्रीय स्तरावरील बाजारात तेंदूपत्ता तेजीत आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याला मागील वर्षीच्या तुलनेत चारपट भाव मिळणार आहे. ही बाब अनेक गावातील नागरिकांना माहित नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पट भाव देणाऱ्यालाही तेंदूपत्ता विकला जात आहे. परिणामी गावांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. लिलावाच्या दिवशी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी उपस्थित राहिल्यास तेंदूला १५ ते २० हजार रूपये प्रतिगोणीपर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा आहे.