शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकाची पेरणी केवळ १८ टक्क्यांवर

By admin | Updated: July 17, 2016 01:04 IST

यंदाच्या खरीप हंगामात उशीरा आलेला पाऊस त्यानंतर अतिवृष्टीने धान पिकाचे पऱ्हे कुजल्यामुळे ...

धान रोवणी १३ टक्के : पावसाने पऱ्हे सडल्याचा परिणाम गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात उशीरा आलेला पाऊस त्यानंतर अतिवृष्टीने धान पिकाचे पऱ्हे कुजल्यामुळे धान पिकाच्या रोवणीचे काम केवळ १३ टक्क्यावर तर जिल्ह्यात खरीप पिकाची पेरणी १८ टक्क्यावर पोहोचली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची रोवणी व इतर पिकांची पेरणी माघारली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्व पिकांचे मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. यामध्ये भात नर्सरीचे क्षेत्र ९ हजार ९३३ आहे. तर आवत्या २० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर आहे. रोवणी व आवत्या मिळून भात लागवडीची एकूण पेरणी २० हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर झाली असून याची टक्केवारी १३ आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात २ हजार ९५४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. कुरखेडा तालुक्यात १ हजार ८८५ हेक्टर क्षेत्र आरमोरी तालुक्यात ३ हजार ९८१ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी तालुक्यात १ हजार ३५ हेक्टर क्षेत्र, सिरोंचा तालुक्यात १४३ हेक्टर, अहेरी तालुक्यात ५२० हेक्टर, एटापल्ली तालुक्यात ३६५ हेक्टर, धानोरा तालुक्यात ६ हजार १८३ हेक्टर, कोरची तालुक्यात ३ हजार २४२ हेक्टर, देसाईगंज तालुक्यात ४६३ हेक्टर क्षेत्र, मुलचेरा २५६ हेक्टर व मुलचेरा तालुक्यात ३०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. इतर तृण धान्याची पेरणी ५३५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात मक्का पिकाची पेरणी २ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत झाली आहे. तूर पिकाची पेरणी ६ हजार ४३२ हेक्टर, मूग ३५० हेक्टर, उडीद १३० हेक्टर, तीळ ६७४ हेक्टर तर सोयाबिनची ५ हजार ६४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची पेरणी आतापर्यंत झाली आहे. एकूण ४ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. तर १८१ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. खरीप पिकाच्या पेरणीत धानोरा, सिरोंचा व कोरची तालुके आघाडीवर आहेत. येथे धान रोवणीचे कामही गतीने सुरू आहे. शेतकरी धान रोवणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी) पीक हाती येण्यास होणार विलंब यंदा पावसाच्या लहरीपणामुळे व उशीरा आगमन झाल्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात धान व इतर खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला नाही. त्यानंतर आठवडाभर संततधार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पिकाचे पऱ्हे टाकणे शिल्लक राहिले. संततधार पाऊस थांबल्यानंतर दोन दिवसाने धान पिकाच्या पेरणीस वेग आला. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीचे काम लांबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खरीप पिकाचे उत्पादन येण्यासाठी यंदा उशीर होणार आहे.