शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

खरीप पिकाची पेरणी केवळ १८ टक्क्यांवर

By admin | Updated: July 17, 2016 01:04 IST

यंदाच्या खरीप हंगामात उशीरा आलेला पाऊस त्यानंतर अतिवृष्टीने धान पिकाचे पऱ्हे कुजल्यामुळे ...

धान रोवणी १३ टक्के : पावसाने पऱ्हे सडल्याचा परिणाम गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात उशीरा आलेला पाऊस त्यानंतर अतिवृष्टीने धान पिकाचे पऱ्हे कुजल्यामुळे धान पिकाच्या रोवणीचे काम केवळ १३ टक्क्यावर तर जिल्ह्यात खरीप पिकाची पेरणी १८ टक्क्यावर पोहोचली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची रोवणी व इतर पिकांची पेरणी माघारली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्व पिकांचे मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. यामध्ये भात नर्सरीचे क्षेत्र ९ हजार ९३३ आहे. तर आवत्या २० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर आहे. रोवणी व आवत्या मिळून भात लागवडीची एकूण पेरणी २० हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर झाली असून याची टक्केवारी १३ आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात २ हजार ९५४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. कुरखेडा तालुक्यात १ हजार ८८५ हेक्टर क्षेत्र आरमोरी तालुक्यात ३ हजार ९८१ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी तालुक्यात १ हजार ३५ हेक्टर क्षेत्र, सिरोंचा तालुक्यात १४३ हेक्टर, अहेरी तालुक्यात ५२० हेक्टर, एटापल्ली तालुक्यात ३६५ हेक्टर, धानोरा तालुक्यात ६ हजार १८३ हेक्टर, कोरची तालुक्यात ३ हजार २४२ हेक्टर, देसाईगंज तालुक्यात ४६३ हेक्टर क्षेत्र, मुलचेरा २५६ हेक्टर व मुलचेरा तालुक्यात ३०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. इतर तृण धान्याची पेरणी ५३५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात मक्का पिकाची पेरणी २ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत झाली आहे. तूर पिकाची पेरणी ६ हजार ४३२ हेक्टर, मूग ३५० हेक्टर, उडीद १३० हेक्टर, तीळ ६७४ हेक्टर तर सोयाबिनची ५ हजार ६४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची पेरणी आतापर्यंत झाली आहे. एकूण ४ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. तर १८१ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. खरीप पिकाच्या पेरणीत धानोरा, सिरोंचा व कोरची तालुके आघाडीवर आहेत. येथे धान रोवणीचे कामही गतीने सुरू आहे. शेतकरी धान रोवणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी) पीक हाती येण्यास होणार विलंब यंदा पावसाच्या लहरीपणामुळे व उशीरा आगमन झाल्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात धान व इतर खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला नाही. त्यानंतर आठवडाभर संततधार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पिकाचे पऱ्हे टाकणे शिल्लक राहिले. संततधार पाऊस थांबल्यानंतर दोन दिवसाने धान पिकाच्या पेरणीस वेग आला. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीचे काम लांबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खरीप पिकाचे उत्पादन येण्यासाठी यंदा उशीर होणार आहे.